28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषपहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!

पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!

हरियाणातील शेतकऱ्यांचा आरोप; त्यांना दिल्लीत रोखण्याची घेतली शपथ

Google News Follow

Related

न्यूज व्ह्यूज या युट्युबआधारित वृत्तवाहिनीने २० फेब्रुवारी रोजी, एक वृत्त प्रकाशित केले आहे. ज्यात हरियाणातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दुसऱ्या आंदोलनाविरुद्ध व्यथा मांडली. या वाहिनीशी बोलताना एका शेतकऱ्याने पहिल्या शेतकरी आंदोलनातील आंदोलकांवर हरियाणातील तरुणांना व्यसनी बनवल्याचा आरोप केला. ‘मागील आंदोलनांपूर्वी कोणालाही हेरॉइनचे व्यसन नव्हते. ते काय आहे ते आम्हाला माहीतही नव्हते. त्या आंदोलनांमध्ये आमची मुले व्यसनाला बळी पडली. याला जबाबदार कोण?’, असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

तर, लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे ही आंदोलने होत असल्याचा दावा एकाने केला. ‘त्यांना परदेशातून निधी मिळत आहे. देशविरोधी कारवाया होत आहेत. परंतु आम्ही मागील आंदोलनादरम्यान जे घडले ते पुन्हा होऊ देणार नाही. त्यांनी आम्हाला मूर्ख बनवले. यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही,’ असे ते म्हणाले. ‘आम्ही आमच्या पंतप्रधानांचा जीव पंजाबमध्ये धोक्यात आणला होता. आता पुन्हा असे होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

, आंदोलक त्यांना दिल्लीला जायचे आहे असे सांगत राहिले आहेत. सरकार जो प्रस्ताव देत आहेत, तो ते स्वीकारत नाहीत. ते केवळ ‘दिल्ली, दिल्ली, दिल्ली’ करतात,’ अशीही टीका त्यांनी केली. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा दाखला देत ते म्हणाले, ‘त्यावेळी आंदोलनस्थळी जाण्यापूर्वी सर्व काही स्कॅन करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत पार पडले. दारू आणि अमली पदार्थांचा पुरवठा बंद करा आणि चार दिवसांत ते आंदोलक कसे गायब होतात ते पाहा,’ असेही मत एका शेतकऱ्याने मांडले.

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशात सर्वाधिक ‘लखपती दीदी’

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

चीनचे सैन्य गुंडगिरीसाठी उभे!

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग आणि खिळे वापरण्याच्या सरकारच्या कृतीबाबत पत्रकाराने त्यांचे मत विचारले तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा कोणी देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सरकारला काही उपाय अवलंबावे लागतात. त्यांच्यासाठी रस्ते मोकळे केले तर ते त्यांच्यी कोंडी करतील आणि अर्थव्यवस्था थांबवतील. शेतकरी आंदोलनादरम्यान हजारो कंपन्यांनी प्रदेश सोडला. हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. त्यांनी विरोध करून या भागाला एक कलंक दिला. कंपन्या परत आल्या नाहीत. मात्र भूतकाळात जे काही घडले, ते पुन्हा होऊ देण्यासाठी हरियाणातील लोक तयार नाहीत,’ असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकारने योजना प्रस्तावित केली, परंतु शेतकऱ्यांनी नकार दिला. पुढील १५ दिवस देशात अशांतता पसरवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांना पंतप्रधान मोदींच्या विरोधात वातावरण निर्माण करायचे आहे. हे सर्व मत कमी करण्यासाठी केले जात आहे, असे ते म्हणाले. पंजाबमध्ये सक्तीचे मजूर असल्याची आठवण करून ते पुढे म्हणाले, ‘आपल्या शेतात काम करणाऱ्या कोणत्या मजुरांसाठी त्यांनी पेन्शनची मागणी केली आहे? तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.

आंदोलकांच्या दाव्यानुसार, आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “माझ्या गावातही चार जणांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने किंवा दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला तर तुम्ही त्यांना शहीद म्हणू शकत नाही. एक काम करा. दोन लाख लोक जमा करा. नैसर्गिक कारणांमुळे दररोज किमान चार मृत्यू होतील. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्यांना शहीद म्हणाल,’ असेही ते म्हणाले.

‘त्यांना पेन्शन हवी आहे. त्यांना कर्जमाफी हवी आहे. ठीक आहे, आम्ही समजून घेऊ. परंतु १४-२० लाख कोटींचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार नाही, याची काळजी कोण घेणार? करदात्याचा पैसा कर्जमाफीसाठी वापरला जाणार नाही हे लेखी द्या. मग किमान आधारभूत किंमत घ्या,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा