32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषनेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय

नेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय

Google News Follow

Related

रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जर सरकारशिवाय इतर कोणालाही औषध दिलं नाही तर लोकांना वाटप करण्यासाठी नेते आणि सेलिब्रिटींकडे हे औषध कसं आणि कुठून येतं? असा प्रश्न विचारत याचा तपास व्हायला हवा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. राज्यातील म्युकरमायकोसिसच्या परिस्थितीसह कोरोनासंबंधित विविध याचिकांवर मुंबईत गुरुवारी (२८ मे) न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहात, असा सवाल हायकोर्टाने केंद्र सरकारला विचारला. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित झाला. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितलं की, “आम्ही याबाबत सर्व रेमडेसिवीर उत्पादकांना नोटीस पाठवून तुम्ही सरकारशिवाय इतरांनाही औषधाची विक्री करत आहात? का विचारणा केली.”  “आम्ही सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर देत नाही,” असं उत्तर सर्व उत्पादक कंपन्यांनी दिल्याचं केंद्र सरकारने सांगितलं.

या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. कारण कोरोना संकटाच्या काळात कोणालाही रॉबिनहून बनण्याची गरज नाही. सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही, असं उत्तर यावेळी राज्य सरकारने दिलं.

तर रेमडेसिवीरच्या साठेबाजी प्रकरणावर सांगताना राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, “आमदार झिशान सिद्दिकी आणि एका सेवाभावी संस्थेमार्फत याबाबतचा खुलासा आलेला आहे. त्यांनी या औषधाचा साठा केलेला नाही किंवा विकतही घेतलेलं नाही. ते केवळ गरजूंना रेमडेसिवीर सहज कसं उपलब्ध होईल यातील दुवा म्हणून काम करत आहेत.” “हे कसं शक्य आहे? तुम्ही हे स्पष्टीकरण स्वीकारलं आहे का?” असा सवाल हायकोर्टाने विचारल्यानंतर, “नाही आम्ही याची शहानिशा करत आहोत. याबाबत संबंधितांना नोटीस पाठवली आहे, असं उत्तर राज्य सरकारने दिलं.

हे ही वाचा:

४४ दिवसांमधील सर्वात कमी रुग्ण

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

राज्य आणि केंद्र सरकारच्या उत्तरानंतर हायकोर्टाने म्हटलं की, “लोकांना मदत करण्यावर आमचा आक्षेप नाही, परंतु मदत योग्य माध्यमातून व्हायला हवी. ज्यांना मदत करायची आहे, ते सरकारच्या माध्यमातून करु शकतात.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा