27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषपहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

Google News Follow

Related

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मोहाली येथे हा सामना सुरु झाला असून पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताने धावफलकावर ३५७ धावा केल्या आहेत. तर त्या बदल्यात भारतीय संघाचे ६ खेळाडू तंबूत परतले आहेत.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल हे भारतातर्फे सलामीसाठी मैदानात उतरले. या दोघांनीही संघाला चांगली सुरवात करून दिली. पण अर्धशतकी भागीदारी करून दोघेही माघारी परतले. त्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

स्फोटाने हादरले भागलपूर

‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’

सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

विहारीने अर्धशतक साजरे केले, तर कोहलीने ४५ धावा केल्या. विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विराट कोहलीच्या या खास कसोटीत तो शतक साजरे करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण चाहत्यांची निराशा झाली. पण त्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी करत भारतीय धावफलक पळवला.

त्याने ९७ चेंडूत ९६ काढावा करून तो बाद झाला. सध्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन भारताकडून खेळात आहेत. जडेजा ४५ धावांवर नाबाद आहे. तर रविचंद्रन अश्विन दहा धावांवर खेळात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा