कॅनडामध्ये गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह रहस्यमय परिस्थितीत आढळून आला. ही माहिती ओटावामधील भारतीय उच्चायोगाने दिली. पंजाबच्या डेरा बस्सी येथील आम आदमी पक्षाचे नेते देविंदर सिंग यांची मुलगी वंशिका उच्च शिक्षणासाठी अडीच वर्षांपूर्वी ओटावामध्ये आली होती.
कॅनडामधील भारतीय उच्चायोगाने ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिलं, “ओटावामध्ये भारतीय विद्यार्थिनी वंशिकाच्या मृत्यूची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं आहे. हा मुद्दा स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला गेला आहे आणि पोलिसांच्या माहितीनुसार, तपास सुरू आहे.
हेही वाचा..
अक्षय तृतीयेला का होते चारधाम यात्रा सुरू?
अहमदाबादेत बांगलादेशींना उखडून टाकण्यासाठी ८० जेसीबी, ६० डंपर
भारतामध्ये सोन्याची मागणी ८०० टनांहून अधिक
पाकिस्तानी हॅकर्सकडून राजस्थानमध्ये सायबर हल्ला
उच्चायोगाने पुढे सांगितले की, ते शोकाकुल कुटुंबीय आणि स्थानिक समुदाय संघटनांशी सतत संपर्कात असून सर्वतोपरी मदतीसाठी तत्पर आहेत. ओटावामधील हिंदू समुदायाने ओटावा पोलिस सेवा विभागाला लिहिलेल्या पत्रानुसार, वंशिका २५ एप्रिलपासून बेपत्ता होती.
यानंतर भारतीय उच्चायोगाने ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले होते की, एका भारतीय विद्यार्थिनीच्या बेपत्ता होण्याच्या माहितीची दखल घेतली गेली असून स्थानिक प्रशासन आणि भारतीय-कॅनडियन समुदाय संघटनांशी संपर्क ठेवला जात आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, वंशिका २५ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ८ ते ९ च्या दरम्यान भाड्याने घर पाहण्यासाठी ७ मॅजेस्टिक ड्राइव्ह येथून बाहेर पडली होती. त्यानंतर रात्री ११:४० च्या सुमारास तिचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिची महत्त्वाची परीक्षा देण्यासाठीही आली नव्हती. कुटुंबीय आणि मित्रांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती सापडली नाही.
पत्रात पुढे लिहिले आहे, “आम्हाला खूप चिंता वाटते आहे आणि खरं सांगायचं तर सर्वांत वाईट गोष्ट घडेल, अशी भीती वाटते आहे. ओटावामधील हिंदू समाज खूप अस्वस्थ आहे आणि प्रत्येक तासागणिक काळजी वाढते आहे. आम्ही तुमच्याकडे यामध्ये विशेष लक्ष देण्याची आणि सहकार्य करण्याची विनंती करतो. आम्ही ओटावा पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आवश्यक संसाधने वापरून तपास वेगाने पुढे न्यायावा. वेळेवर आणि गंभीर पावले उचलल्याने वंशिकाला सुरक्षित परत आणणे शक्य झाले असते.