24 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरविशेषमांसमच्छीच्या दुकानांमुळे सोकावलेल्या कुत्र्यांनी केला मुलीवर हल्ला, मुलीचा मृत्यू!

मांसमच्छीच्या दुकानांमुळे सोकावलेल्या कुत्र्यांनी केला मुलीवर हल्ला, मुलीचा मृत्यू!

कानपूरमधील ही दुकाने केली उद्ध्वस्त

Google News Follow

Related

चिकन-मटण आणि मासे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी जमलेली असते.तसेच मांसाचे तुकडे खाण्यासाठी कुत्रे-मांजर देखील दुकानाबाहेर रेंगाळत असतात.ग्राहकाला त्याची ऑर्डर दिल्यानंतर खाण्यायोग्य नसलेला भाग दुकानदार कुत्रे-मांजरांपुढे टाकून देतो.परंतु, अशा भटक्या कुत्र्यांमुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.कानपूरमध्ये रविवारी (२६ मे) भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत एका मुलीला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी मांस आणि माशांची अनेक दुकाने तोडण्याचे आदेश दिले.अशा दुकानांमुळे भटके कुत्रे आक्रमक झाल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजताच महापौर प्रमिला पांडे पीडित कुटुंबांची भेट घटली.यावेळी संतप्त रहिवाशांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांचा दाखला देत, पोलिसांच्या हस्तक्षेपाच्या अभावावर टीका केली आणि निराशा व्यक्त केली.रहिवाशांची बैठक घेतल्यानंतर महापौरांनी बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा:

मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० कामगारांचा मृत्यू

भारतीय संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या युट्यूबर कॅरोलिना गोस्वामीला ध्रुव राठीच्या चाहत्यांकडून बलात्काराच्या धमक्या!

बोनेटवर बसून बीएमडब्ल्यूची सफर करणाऱ्याला अटक, चालकाचे वडीलही ताब्यात!

इस्रायलचे नेत्यानाहू म्हणतात, क्षेपणास्त्र डागली, चूक झाली!

महापौरांच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झाली.तोडफोड सुरू असताना दुकानदारांनी विरोध दर्शवत बुलडोझर बंद करण्याची मागणी केली.परंतु, महापौरांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही आणि कारवाई सुरूच ठेवली.तब्बल ४४ दुकानांवर कारवाई करत बुलडोझर चालवण्यात आले.तसेच ही दुकाने पुन्हा सुरू केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा महापौरांनी दुकानदारांना दिला.

महानगरपालिकेच्या अहवालानुसार, कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनामागील मुख्य कारण म्हणजे मांस आणि मासळीच्या दुकानातून बाहेर टाकण्यात येणारा टाकाऊ भाग, ज्याचे सेवन केल्यानंतर जनावरांना त्रास होतो.मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, दूषित मांसाचे सेवन केल्याने कुत्र्यांमध्ये आक्रमक वर्तन होते, ज्यामुळे अशा घटना घडतात.दरम्यान, भटक्या कुत्र्यांना पाणी द्यावे आणि शक्य असल्यास त्यांना पिण्यासाठी घराबाहेर पाणी ठेवावे, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा