एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचे समाजात प्रेमभावना, शांतता व सद्भावना निर्माणाचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
हेही वाचा..
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
पंतप्रधान मोदी फ्रान्स- अमेरिका दौऱ्यासाठी रवाना
‘इंडियाज गॉट लॅटेंट’मध्ये स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारला, हिंदू आयटी सेलने केली तक्रार
महाकुंभात सात हजार हून अधिक महिलांनी घेतला संन्यास!
कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा सदर अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारीसंस्था ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहे, त्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अशावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतात, असे त्यांनी सांगितले.
जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्वाच्या आहे परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्व देतील असे राज्यपालांनी सांगितले.