या उपक्रमाचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मैलासाफीसारख्या कठीण, घाणेरड्या आणि जीवघेण्या कामात कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक पर्याय उपलब्ध करून देणे आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व प्राधान्य
या यंत्रांचे ऑपरेशन आणि देखभाल करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, ही यंत्रे चालवण्याच्या कामात त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्यवृद्धी होणार असून, त्यांना अधिक सुरक्षित आणि प्रतिष्ठित रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील नगरविकास विभागाकडून या यंत्रांची खरेदी करण्यात येणार होती, परंतु काही महिन्यांच्या विलंबानंतर, ही जबाबदारी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे सोपवण्यात आली आहे. या यंत्रांचे वाटप २९ महानगरपालिकांमध्ये केले जाईल.
सरकारने हाताने मैला साफ करण्याच्या अमानवीय प्रथेला आळा घालण्याच्या दिशेने उचललेले पाऊल रोजगार प्रतिबंध आणि पुनर्वसन कायदा, २०१३ च्या अनुषंगाने आहे. केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला हा कायदा हाताने मैला साफ करणे बंद करण्याबरोबरच, त्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या सन्माननीय पुनर्वसनाची हमी देतो.
या कायद्यानुसार, गटार आणि सेप्टिक टाक्यांच्या सफाईसाठी यांत्रिक आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्याच अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपये खर्चून १०० रोबोटिक सीवर क्लीनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :