31 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरविशेषऑपरेशन सिंदूर गेम चेंजर

ऑपरेशन सिंदूर गेम चेंजर

Google News Follow

Related

मंगळवारी राज्यसभेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू झाली. या चर्चेची सुरुवात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला ऑपरेशन सिंदूर हा एक गेम चेंजर ठरला आहे. राजनाथ सिंह यांनी सांगितले की सोमवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ (TRF) या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षाबळांना यश आले. हेच ते दहशतवादी होते ज्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम परिसरात २६ निरपराध नागरिकांची क्रूर हत्या केली होती. त्यांनी भारतीय सैन्य व इतर सुरक्षा यंत्रणांचे संसदेमार्फत अभिनंदन केले.

संरक्षणमंत्री म्हणाले की ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट करणे होते आणि भारत हा दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स ठेवतो, हे स्पष्ट संदेश देणे होते. त्यांनी असेही सांगितले की ऑपरेशन सिंदूर फक्त वर्तमान काळापुरते मर्यादित नसून ते भारताच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरू शकते. राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरला केवळ विराम मिळाला आहे, पूर्णविराम नाही.” त्यांनी टोला लगावत सांगितले की, काही लोकांना वाटते की पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत म्हणून त्यांच्याशी केवळ संवाद साधत राहायला हवा. पण त्याच कारणास्तव आपण आपले असंख्य नागरिक गमावले आहेत.

हेही वाचा..

‘ऑपरेशन महादेव’: दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!

पुतीन यांच्याकडे ५० नाहीतर केवळ १२ दिवस नाहीतर निर्बंधांना सामोरे जा!

डीआरडीओकडून ‘प्रलय’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

कॅनडामध्ये विमान दुर्घटना; एका भारतीयाचा मृत्यू

त्यांनी पुढे सांगितले की, “आपला दृष्टीकोन स्पष्ट आहे – आम्ही विटेचा उत्तर दगडाने देऊ.” नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणे योग्य असले तरी दररोज पाजणे योग्य नाही, असे उपरोधिक विधानही त्यांनी केले. सिंह म्हणाले की ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी भारतीय सैन्याने सर्व बाजूंनी बारकाईने अभ्यास केला. आमच्याकडे अनेक पर्याय होते, पण आम्ही असा पर्याय निवडला ज्यात दहशतवाद्यांना आणि त्यांच्या अड्ड्यांना जास्तीत जास्त नुकसान होईल, मात्र पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना काहीही इजा होणार नाही. ते म्हणाले की, कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र आपला स्वभाव आणि चारित्र्यानुसार प्रतिक्रिया देते. त्या प्रतिक्रियांचे दीर्घकालीन परिणाम असतात. त्यामुळे कुठलाही मोठा निर्णय घेताना वर्तमानाबरोबरच भविष्याचा विचार करणे आवश्यक असते.

राजनाथ सिंह यांनी क्रांतीकारकांचा दाखला देत सांगितले की, चंद्रशेखर आजाद, भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी जेव्हा स्वातंत्र्यासाठी झुंज दिली, तेव्हा ती “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” नव्हे, तर “री-डिस्कव्हरी ऑफ इंडिया” होती. ते म्हणाले की, आपल्या देव-देवतांनी सदैव शस्त्र धारण केले. देवी दुर्गा, देवाधिदेव महादेव, श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्याही हातात शस्त्र होते आणि त्यांनी कधीही भित्रेपणाचे पाठ शिकवले नाहीत. गोस्वामी तुलसीदासांनीही म्हटले आहे – “तुलसी मस्तक तब नवै, जब धनुष बाण लेउ हाथ” – म्हणजेच प्रभू कितीही सुंदर आणि सज्जन असले, तरी तुलसी त्यांना वंदन तेव्हाच करतो जेव्हा त्यांच्या हातात धनुष्यबाण असतो.

संरक्षणमंत्री म्हणाले की, दीर्घकाळ भारताबाबत अशी धारणा होती की भारत आक्रमक नाही, शांतताप्रिय आहे – ही गोष्ट भारताच्या राष्ट्रीय चारित्र्यासाठी लाजिरवाणी होती. मात्र आता आपण ही ओळख बदलत आहोत आणि ऑपरेशन सिंदूर हे त्याचे ठोस उदाहरण आहे. ते म्हणाले की, अतिरेक्यांनी भारताला “सॉफ्ट स्टेट” समजले होते. भारतावर दहशतवादी हल्ला करणे हे त्यांच्या दृष्टीने “लो कॉस्ट, हाई रिटर्न” होते. थोडेसे अतिरेकी येऊन आपले नागरिक मारून परत जात. पूर्वीच्या सरकारांनी हे सगळं गप्प बसून पाहिलं, त्यामुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढला. शेवटी त्यांनी सांगितले की जर विरोधकांना सत्ताधाऱ्यांची धोरणे पसंत नसतील, तर त्यांनी त्याला पर्यायी योजना द्यावी.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा