28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषभारत सरकारने 'तहरीक-ए-हुर्रियत'ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

टीईएच गटाला दहशतवादी संघटना म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती घोषणा

Google News Follow

Related

केंद्र सरकारने ३१ डिसेंबर रोजी पाकिस्तान समर्थक गट ‘तहरीक-ए-हुर्रियतला’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली.ही संघटना बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेली असून जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करून राज्यात इस्लामिक शासन स्थापन करायचे आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.मात्र, भारताने काश्मीरमध्ये तहरीक-ए-हुर्रियतवर (टीईएच) बंदी घातल्याने पाकिस्तान अडचणीत सापडला असून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

यासंदर्भांत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रेस रिलीजनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने टीईएचवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. अशा प्रकारे कोणत्याही पक्षावर बंदी घालणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. असे निर्णय घेऊन भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची पायमल्ली करत असून काश्मिरी लोकांचे हक्क दडपत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

हे ही वाचा:

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

ओडिशा: पुरीतील जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू!

जपानमध्ये झालेल्या भूकंपात १२ जणांचा मृत्यू

गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू-काश्मीर यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली आढळल्यास ती नष्ट केली जाईल.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी २००४ मध्ये तहरीक-ए-हुर्रियतची स्थापना केली होती. गिलानी यांच्यानंतर तेहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष मुहम्मद अशरफ सेहराय होते, त्यांचेही २०२१ मध्ये निधन झाले. ही संघटना हुर्रियत कॉन्फरन्सची सहयोगी संघटना आहे. हुर्रियत कॉन्फरन्स हा जम्मू-काश्मीरमधील २६ संघटनांचा एक गट आहे, ज्याची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. हुर्रियत कॉन्फरन्समध्ये पाकिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी समजल्या जाणाऱ्या अनेक संघटनांचा समावेश आहे. यामध्ये जमात-ए-इस्लामी, जेकेएलएफ आणि दुख्तरन-ए-मिल्लत इत्यादींच्या नावांचा समावेश आहे. २००५ मध्ये हुर्रियत कॉन्फरन्स दोन गटात विभागली गेली. मिरवाईज उमर फारुख यांना त्यांच्या मध्यम गटाचे नेतृत्व मिळाले. या अतिरेकी गटाचे नेतृत्व सय्यद अली शाह गिलानी करत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा