29 C
Mumbai
Tuesday, March 24, 2026
घरविशेषशेतकऱ्याचा मुलगा झाला भारताचा सरन्यायाधीश

शेतकऱ्याचा मुलगा झाला भारताचा सरन्यायाधीश

Google News Follow

Related

भारताचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही रामण्णा यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. काल सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे हे या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्यानंतर बोबडे यांनीच शिफारस केल्याप्रमाणे एन. व्ही. रामण्णा यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचा:

खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?

कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत

ट्रम्पनंतर बायडनचेही ‘अमेरिका फर्स्ट’

‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यापूर्वीच न्यायमुर्ती रामण्णा यांच्या शिफारसीला मान्यता दिली होती. आज त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ राष्ट्रपती भवनात देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी नियुक्त होण्यापूर्वी रामण्णा दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश होते. न्यायमुर्ती शरद बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर आता रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारला आहे. न्यायमुर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे.

न्यायमुर्ती रामण्णा यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आंध्र प्रदेशच्या विविध न्यायालयांतून वकीली केली. त्यानंतर त्यांची २७ जुन २००० रोजी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणुक झाली होती. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायधीश म्हणून १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत काम पाहिले होते. आता त्यांची नियुक्ती भारताचे ४८वे सरन्यायधीश म्हणून करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा