29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषजाळपोळ होत होती, भयंकर परिस्थिती होती, पण राज्य सरकारने मदतीचा हात दिला

जाळपोळ होत होती, भयंकर परिस्थिती होती, पण राज्य सरकारने मदतीचा हात दिला

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्र हलवत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. तर, पुढे विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.

तणावग्रस्त भागातून सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायचे आहेत. मणिपूरमधील परिस्थिती खूपच वाईट होती, इंटरनेट बंद होते आणि गोळीबार होत होता,” अशा भावना मणिपूरमध्ये अडकलेला विद्यार्थी रोहित याने मुंबईत आगमन होताच व्यक्त केल्या आहेत.

लोक घरांची जाळपोळ करत होते. स्फोट होत होते. गोळीबार होताना पाहिला एकूणच भयंकर परिस्थती असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. अशावेळी राज्य सरकारने मणिपूरमधून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल या विद्यार्थ्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले होते.

हे ही वाचा:

अनिल परब प्रकरणाची आजपासून सुनावणी

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी

मणिपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी राज्यामध्ये कुकी आदिवासी गटाने काढलेल्या निषेध मोर्चामुळे अशांतता उफाळून आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आदेशात राज्य सरकारला मैतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) यादीत समावेश करण्याच्या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा