बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नेत्यांमध्ये शब्दांच्या फैरी झडत आहेत. सध्या विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव “बिहार अधिकार यात्रा” काढत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “तेजस्वींना काँग्रेसकडून अपेक्षित असा सन्मान मिळालेला नाही. त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला, पण काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी स्वाभाविक आहे.”
विरोधकांवर टीका करताना पासवान म्हणाले, ते तरुणांना नोकऱ्या देण्याबद्दल बोलत आहेत. त्यांना विचारा की कोणाच्या कार्यकाळात तरुणांना बिहार सोडण्यास भाग पाडले गेले. देशाच्या इतिहासात कोणत्याही राज्यात किंवा काळात सर्वाधिक स्थलांतर त्यांच्या कार्यकाळात झाले असेल तर ते त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९९० च्या दशकात बिहारमधील तरुणांना तेथून निघण्यास भाग पाडले गेले. जर ते आजच्या तरुणांबद्दल बोलत असतील तर त्यांना त्या काळाचे उत्तर द्यावे लागेल.
दरम्यान, तेजस्वी यादव सध्या बिहार अधिकार यात्रेवर आहेत. ही यात्रा १६ सप्टेंबरला सुरु झाली असून २० सप्टेंबरला संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी टीका केली. एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “तेजस्वी यादव जे करत आहेत ती यात्रा नाहीये, तर ते लाचार आहेत. राहुल गांधींनी त्यांना कधी लुटले हे त्यांना कळले नाही. त्यांनी (राहुल गांधी) त्यांचे सर्व राजकीय ग्लॅमर लुटले आणि ते त्यांच्या मागे लागले.
हे ही वाचा :
असीम मुनीर यांनीचं लष्कराला दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश दिलेले!
कोट्यावधीचा घोटाळा प्रकरणी लोढा डेव्हलपर्सचा माजी संचालक गजाआड!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजा चार्ल्स यांच्याकडून वाढदिवसाची ‘ही’ खास भेट!
पाक-सौदी संरक्षण करारावर भारताची नजर
तेजस्वी आता ताकद दाखवण्याचा आणि राहुल गांधींना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ते वैयक्तिकरित्या देखील सक्षम आहेत. काँग्रेसचं स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नाही; ती RJD वरच अवलंबून आहे. तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला, पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले नाही, याचा त्यांना राग आहे. ही यात्रा म्हणजे त्याच नाराजीचा परिणाम आहे, असे मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.
#WATCH | Begusarai, Bihar | On RJD leader Tejashwi Yadav's Bihar Yatra, Union Minister Giriraj Singh says, "What Tejashwi Yadav is doing is not a Yatra. He helpless. He did not realise when Rahul Gandhi looted him. He (Rahul Gandhi) looted all their political glamour, and he kept… pic.twitter.com/EC56Ve27pi
— ANI (@ANI) September 18, 2025







