२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यावर भारताने देखील कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी देशभरात जोर धरू लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी नेत्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर भारताच्या भूमिकेकडे देशासह जगाची नजर होती.
दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण असताना भारताने ७ मे रोजी देशभरात ‘मॉक ड्रील’चे आयोजन केले. यानंतर असे वाटले होते कि भारत काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत आहे. आणि असे असताना अचानक पहाटे बातमी समोर आली कि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’राबवत पाकिस्तानवर हल्ला केला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. भारताच्या या कामगिरीनंतर देशभरात जल्लोष सुरु झाला आणि भारताने अखेर बदला घेतल्याचे समाधान झाले. मात्र, अशातच एका माजी लष्करप्रमुखाचे सूचक विधान समोर आले आहे.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एक्सवर पोस्टकरत ‘अभी पिक्चर बाकी है’, असे म्हटले आहे. माजी लष्कर प्रमुखाच्या या पोस्टमुळे गूढ वाढले आहे. भारताने केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरसह १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. अशातच माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पोस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टमुळे भारत या पेक्षाही आणखी काही मोठा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताकडून जगाला दिला गेलेला दहशतवादाविरोधातला स्पष्ट संदेश
१० मेपर्यंत काही फ्लाइट्स रद्द
अजित डोभाल यांनी अनेक देशांना कोणती माहिती दिली ?
मुंबईच्या तोंडातला घास गुजरातने हिसकावला!
दरम्यान, भारताच्या या कारवाईत भारतीय हवाई दलाने नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. ही ठिकाणे दहशतवादी कारवायांची केंद्रे सांगितली जात आहेत. संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रतिसाद म्हणून वर्णन केले.
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025