उत्तर प्रदेशचे मंत्री अनिल राजभर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले, “अखिलेश यादवांना जर काही अडचण होती, किंवा निवडणूक आयोगावर विश्वास नसेल, तर त्यांना न्यायालयात जाण्यापासून कोणी थांबवलं होतं का? विरोधक सोशल मीडियाच्या आणि माध्यमांच्या माध्यमातून जनतेला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जनता चांगल्या प्रकारे ओळखते. कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व काही स्पष्ट झालं आहे. आयोगाने देखील स्पष्ट केलंय की, जर कोणाकडे खात्रीशीर तथ्ये असतील, तर त्यांनी ठरलेल्या प्रक्रियेनुसार कारवाई करावी.”
खरे तर, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. मागासवर्गीयांची मते जाणूनबुजून कापली जात असल्याचा आरोप सपा अध्यक्षांनी केला. ते म्हणाले, जर निवडणूक आयोगाने आम्हाला हव्या त्या स्वरूपात मतदार यादी दिली तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
हे लोक जाणूनबुजून मागासवर्गीयांची मते कापतात आणि दाखवतात की त्यांना (भाजपाला) मागासवर्गीय मते मिळत आहेत. पण सत्य हे आहे की त्यांची मते वगळली जात आहेत. छिब्रागंजच्या शाहगंजमध्ये आमचा खूप कमी मतांनी पराभव झाला आहे. जर त्यांनी आम्हाला योग्य मतदार यादी दिली तर सर्व काही स्पष्ट होईल, असे अखिलेश यादव म्हणाले.
हे ही वाचा :
पुढील ४८ तासांसाठी मुंबई, ठाणे रेड अलर्ट जारी!
उपराष्ट्रपती निवडणूक: नितीश कुमार यांचा एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा!
‘त्या’ ६५ लाख मतदारांची यादी केली जाहीर!
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दोन दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक!
दरम्यान, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपाबद्दल आयोगाने त्यांना फटकारले आणि सात दिवसांच्या आत पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यास, नाहीतर माफी मागण्यास सांगितले आहे. मंत्री अनिल राजभर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “नक्कीच राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. तुम्ही देशातील जनतेसोबत एक गलिच्छ विनोद करत आहात. जगभर ज्याची प्रशंसा होते अशा निवडणूक आयोगावर तुम्ही खोट्या आरोपांमधून संशय घेत आहात.
त्यामुळे देशाची माफी मागायलाच पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानाला स्वीकार करा आणि काही पुरावे असतील तर सादर करा.”
#WATCH | Lucknow: On the CEC's press conference, Uttar Pradesh Minister Anil Rajbhar says, "…If Akhilesh Yadav had any problem, if he did not have trust in the Election Commission, then who stopped him from going to the court… The public is well aware of the efforts of the… pic.twitter.com/PgEJL2f6E3
— ANI (@ANI) August 18, 2025







