32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषपंजाबच्या तुरुंगात अंमली पदार्थांची विक्री, चुकीचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन!

पंजाबच्या तुरुंगात अंमली पदार्थांची विक्री, चुकीचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन!

पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचे आवाहन

Google News Follow

Related

राज्यातील तुरुंगामध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं दावा पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे.त्यांचे हे विधान चुकीचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असेही ते म्हणाले.कारवाई न केल्याबद्दल काँग्रेस नेत्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका केली.ते म्हणाले, उच्च न्यायालयाने या विषयावर आठवडाभरात धोरण तयार करण्यास सांगितले आहे.मुख्यमंत्री मान स्वतः तुरुंगमंत्री आहेत.अखेर त्यांनी काय केले? कारागृहात अंमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री होत आहे.माझे आरोप चुकीचे सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडून देईन, असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

१९८८ मधील रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर १० महिने तुरुंगात घालवल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू परतले आहेत.या घटनेत पटियाला येथील रहिवासी गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता.तथापि, त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची तुरुंगवासाची मुदत संपण्यापूर्वी त्याची सुटका करण्यात आली.

हे ही वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!

पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा

नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने या प्रकरणी महत्वपूर्ण निर्देश दिलेले असताना तुरुंगात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा दावा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे.न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला दोन्ही राज्यातील अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन लोकांचा स्टेट्स रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे.

सिद्धू यांनी पंजाबमधील वाढत्या कर्ज आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरूनही आप सरकारवर टीका केली. राज्य सरकार केंद्राचा निधी अपेक्षित कामांसाठी वापरत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.या कारणामुळेच केंद्राने पंजाबसाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी थांबवला आहे.केंद्राच्या योजनेत ४० टक्के वाटा देण्यासाठीही राज्य सरकारकडे पैसे नाहीत.या गोष्टी राज्याची आर्थिक स्थिती स्पष्ट करतात,ते पुढे म्हणाले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा