28 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरविशेषभारतीय नौदल बनवत आहे भूमिगत पाणबुडी बंकर

भारतीय नौदल बनवत आहे भूमिगत पाणबुडी बंकर

नौदलाची ताकद वाढणार; चीन आणि पाकिस्तानात धडकी

Google News Follow

Related

भारतीय नौदल आयएनएस वर्षा हा नवा तळ बांधत आहे. भारताच्या आण्विक पाणबुड्या या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या तळावर ठेवलेली अणुपाणबुडी कोणाच्याही दृष्टीपथात पडणार नाही. कारण हा तळ भूमिगत असणार आहे. यापूर्वी, हा तळ गंगावरम येथे बांधण्यात येणार होता. पण नंतर विशाखापट्टणमपासून ५० किमी अंतरावर असलेल्या रामबिल्ली येथे ते बांधले जात आहे.

विशाखापट्टणम बंदरात नौदल आणि जहाजबांधणी मंत्रालयाची जहाजे वारंवार येत असतात. या जहाजांमुळे विशाखापट्टणममध्ये अन्य जहाजांना जागा शिल्लक राहत नाही. या ठिकाणी २००६ मध्ये १५ युद्धनौका तैनात करण्यात आल्या होत्या. पण आता ही संख्या ४६ इतकी झाली आहे. ही संख्याही सातत्याने वाढत आहे. आयएनएस वर्षा नौदल तळावर किमान ८ ते १२ पाणबुड्या या बेसवर तैनात असणार आहेत.

आयएनएस वर्षा हा प्रकल्प वर्षाअंतर्गत बांधला जात आहे. हा नेव्हल अल्टरनेटिव्ह ऑपरेशन बेस (एनएओबी) असणार आहे. पुढील वर्षापर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा तळ उभारण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. तेव्हापासून त्याचे काम वेगाने सुरू आहे. जेणेकरून नौदलाची ताकद वाढवता येईल.

हेही वाचा :

निलंबित खासदारांना मतदानाचा हक्कही नाही; दैनंदिन भत्त्यापासूनही मुकावे लागणार!

दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला उडवले!

सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…

दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!

तळ भूमिगत, पाणबुड्या सुरक्षित 

रामबिल्ली नौदलतळ आंध्र प्रदेशातील अनाकपल्ले जिल्ह्यात आहे. हे तळ अशा ठिकाणी आहे की, भारतीय नौदल पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनाऱ्यांचे सहज संरक्षण करू शकतील. ओपन सोर्स सॅटेलाईट इमेजेसनुसार पहिल्या टप्प्यातच डझनभर बोगदे तयार करण्यात आले आहेत. म्हणजेच हा तळ भूमिगत असणार आहे.

नौदलाचा तळ अणुकेंद्राजवळ

या बोगद्यांमध्ये ८ ते १२ अण्वस्त्रधारी बॅलेस्टिक पाणबुड्या आणि असॉल्ट पाणबुड्या ठेवण्यात येणार आहेत. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) केंद्राजवळ हा तळ आहे. त्यामुळेते सुरक्षित असणार आहे. एनएओबीमध्ये पाण्याखालील बोगदे असतील. ज्याच्या आत पाणबुड्या ठेवल्या जातील.

चीन आणि पाकिस्तानला धडकी

याशिवाय अनेक प्रकारच्या नौदलाच्या युद्धनौकाही येथे उभ्या राहू शकतील. भारत ज्या प्रकारे आपली नौदल शक्ती वाढवत आहे, त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला धडकी भरली आहे. या पायथ्यावरील भाग डोंगराळ आहे. त्याच्यावर जंगल आहे. हे सुमारे ६७० हेक्टरवर पसरलेले आहे. येथून बीएआरसीचे अंतर केवळ २० किलोमीटर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा