29 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषनीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जींची नौटंकी

नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जींची नौटंकी

अधीर रंजन चौधरी यांचा आरोप

Google News Follow

Related

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आजच्या नीती आयोगाच्या बैठकीत त्यांचा मायक्रोफोन बंद करण्यात आल्याच्या ममता बॅनर्जींच्या आरोपांबद्दल मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना अधीर रंजन म्हणाले की त्या खोटे बोलत आहेत ही त्यांची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीआयबीने ममता बॅनर्जी यांचा जो आरोप आहे तो खोडून काढला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या आरोपांबद्दल एएनआयशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, “नीती आयोगाच्या बैठकीबाबत ममता बॅनर्जी ज्या गोष्टी बोलत आहेत, त्या मला खोटं बोलत आहेत असं वाटत. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं जात नसतं तर हे खूप आश्चर्यकारक आहे. तिथे काय घडणार हे ममता बॅनर्जींना माहीत होते. त्यांच्याकडे स्क्रिप्ट होती.
त्यांच्या मते राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून आता पुढे आले आहेत. त्यांचे कौतुक होत आहे, यामुळे ममता बॅनर्जींना हेवा वाटू लागला आहे. ममता बॅनर्जी की जलन (राहुल गांधींचा मत्सर) शयाद थोडी जरूरत से ज्यादा हो गई है, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!

सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !

शिळफाटा अत्याचार, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !

अधीर रंजन यांनी भारताच्या राष्ट्रपतींना पत्र लिहून पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांच्या पत्रात त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर चिंता आणि टीएमसीच्या धमकावण्याचे राजकारण आणि राज्यातील विरोधी पक्षांना घाबरवण्याचे प्रकार लिहिले आहेत. त्यांनी संदेशखळी घटनेचा संदर्भ दिला आहे आणि मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जातीय दंगली केल्याचा आरोप टीएमसीवर केला आहे.

विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अनेक भीषण हत्या या वस्तुस्थिती दर्शवतात की राज्यात विरोधकांसाठी जागा नाही. ते पुढे म्हणाले की राज्यात “अघोषित आणीबाणी” प्रचलित आहे आणि अशा प्रकारे पश्चिम बंगालमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती राष्ट्रपतींना केली. पत्रात पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, कामगार, सहानुभूतीदार आणि सत्ताधारी पक्षाच्या निर्दयी दृष्टिकोनामुळे पश्चिम बंगाल राज्यातील अराजक स्थिती पाहणे केवळ त्रासदायकच नाही, तर अत्यंत दुःखदायकही आहे.

टीएमसीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर, सहानुभूतीदारांवर आणि पक्षांच्या समर्थकांवर जोरदार आणि दहशतीने भरलेल्या हल्ल्यांमुळे निवडणुकीच्या टप्प्यात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला, किंवा तुरुंगात टाकण्यात आले किंवा ताब्यात घेण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा