नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वाद आणि देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदलांना सुरुवात झाली आहे. या अंतर्गत एनटीएने शुक्रवारी ४७ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. या अधिकाऱ्यांपैकी काहींवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटीच्या घटनांमुळे एनटीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परीक्षांच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर परिणाम झाल्याने केंद्र सरकारने संस्थेच्या कामकाजात व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जबाबदारी निश्चित करणे, प्रशासन अधिक सक्षम करणे आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गळतीमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.
हे ही वाचा:
‘तिरंग्याचा मान उंचवा!’; भारतीय चमूला मोदींचा विजयमंत्र
रोहित पवार, अंधारे, वर्षा गायकवाडांचे आरोप खोटे, पोलिसांचे स्पष्टीकरण
पालघरमध्ये पावसाचा कहर! सूर्या-वैतरणा धोक्याच्या पातळीवर
सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ सुरुवात असून आगामी काळात एनटीएमध्ये आणखी संरचनात्मक बदल केले जाणार आहेत. परीक्षा व्यवस्थापन अधिक आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर भर दिला जाणार असून भविष्यात पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कडक सुरक्षा यंत्रणा लागू करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.







