२०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बिहार सज्ज होत असताना, सूत्रांचे म्हणणे आहे की भाजप आणि जेडीयू समान संख्येने जागा लढवण्याची तयारी करत आहेत, ज्यामध्ये दोन्ही एनडीए भागीदारांमध्ये एकूण २०५ जागा विभागल्या जातील. जागावाटपाची चर्चा अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष किती जागा लढवणार याचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. उर्वरित ३८ जागा एनडीएच्या छोट्या मित्रपक्षांमध्ये, लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी), हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएम) मध्ये वाटल्या जाण्याची शक्यता आहे.
भाजपाने लोजपा प्रमुख चिराग पासवान यांना २५ जागा, एचएएम नेते जीतन राम मांझी यांना सात जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमला सहा जागा देऊ केल्या आहेत, असे वृत्त आहे. चिराग पासवान यांच्याशी वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले जात आहे, लोजपा नेते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसाठी पसंतीचे मतदारसंघ शोधत आहेत. जर पासवान यांच्या जागांचा वाटा वाढला तर मांझी आणि कुशवाह यांच्या वाटपात कपात होऊ शकते.
”काशीमध्ये हनुमान चालीसा नाही तर अजानही नाही”
दिवाळी होणार गोड! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज
अमेरिकेच्या तिजोरीला लागलेल्या टाळ्याचा फटका हवाई वाहतुकीला
गुजरातमधील द्वारका शहरात पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक
भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांत- ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर सुरळीत होण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.







