नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी (TCS) च्या बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप समोर आल्यानंतर आता आणखी काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. एका पुरुष सहकाऱ्याने दावा केला आहे की, त्याला डोक्यावर टोपी घालण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडले गेले. त्याने पुढे असाही आरोप केला की, आरोपींपैकी एकाने त्याला, “जर तुला मूल हवे असेल तर तुझ्या पत्नीला पाठव” असे सांगितले.
पीडित व्यक्तीने आरोप केला की, त्याच्या टीम लीडर्सनी त्याला नमाज पठण करण्यास, कलमा वाचण्यास आणि डोक्यावर टोपी घालण्यास भाग पाडले. यापुढे आरोपींपैकी एकाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवली आणि मूल हवे असेल तर आपल्या पत्नीला पाठव असे सुचवले. पीडिताच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर त्याचा छळ सुरू झाला. त्याचा टीम लीडर, तौसीफ अटारी, आणि त्याचा सहकारी दानिश शेख यांनी त्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अधिकाराच्या पदावर असल्याने, तौसीफने पीडिताला सर्व सूचनांचे पालन करण्यास भाग पाडले आणि त्याला इतरांच्या कामांसहित अतिरिक्त कामाचा बोजा त्याच्यावर टाकला.
पीडित व्यक्ती, जो एक धर्मनिष्ठ हिंदू आणि रामदास स्वामींचा अनुयायी असून नियमितपणे रुद्राक्ष माळ घालतो, त्याने सांगितले की त्याची धार्मिक ओळख वादाचा मुद्दा बनली होती. त्याने आरोप केला की त्याचे सहकारी वारंवार हिंदू श्रद्धांची खिल्ली उडवत, हिंदू देवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणि महाराष्ट्रातील धार्मिक व्यक्ती आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत असत. हा छळ केवळ शाब्दिक शिवीगाळीपुरता मर्यादित नव्हता. पीडिताने आरोप केला की, रात्रीच्या शिफ्टनंतर त्याला हॉटेल्समध्ये नेले जायचे आणि कट्टर शाकाहारी असूनही मांसाहारी जेवण खाण्यासाठी दबाव टाकला जायचा. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याच्या श्रद्धांची खिल्ली उडवली गेली.
त्याने पुढे असा आरोप केला की, २०२३ साली ईदच्या दिवशी तौसीफ त्याला आपल्या घरी घेऊन गेला, त्याला धार्मिक टोपी घालायला लावली, नमाज पढायला भाग पाडले आणि त्याचे फोटो काढले, जे नंतर त्याला अपमानित करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत ग्रुपमध्ये शेअर करण्यात आले. पीडिताने असाही दावा केला आहे की, आरोपींनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य केले आणि लग्नाला अनेक वर्षे होऊनही त्याला व त्याच्या पत्नीला मूलबाळ नसल्याच्या वस्तुस्थितीची खिल्ली उडवली. त्याने असा आरोप केला की, आरोपींनी अत्यंत अपमानजनक टिप्पणी करत, जर त्याला मूल हवे असेल तर त्याने आपल्या पत्नीला त्यांच्याकडे पाठवावे असे सुचवले.
हे ही वाचा:
इराण तणावात अमेरिकेने महागडा MQ-4C ट्रायटन ड्रोन गमावला
भारतीय रेल्वेचे ब्रिटन, रशिया, चीनपेक्षा जास्त विद्युतीकरण
भारत- अमेरिका जेट इंजिन करार; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावर भर
पाकिस्तानात सिरिंजचा पुनर्वापर; ३३१ मुलांना HIV संसर्ग
पीडित व्यक्तीने विरोध केल्यावर परिस्थिती चिघळली, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी वाद झाला. त्याने आरोप केला की तौसीफने त्याच्यावर टेबल फॅन फेकला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडिताने पुढे तौसीफ, दानिश, शाहरुख आणि रझा मेमन यांच्यासह असलेल्या गटावर महिला कर्मचाऱ्यांबद्दल अनुचित टिप्पणी केल्याचा आणि त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. त्याने असाही दावा केला की, जेव्हा त्याच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला, तेव्हा आरोपींनी त्याला सांगितले की, जर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला तर त्याचे वडील बरे होतील. त्याने त्यांच्या मागण्या मान्य करणे बंद केल्यावर, त्याला कामावरून काढून टाकण्याच्या प्रयत्नात त्याच्याविरुद्ध मुख्य कार्यालयात खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या, असा आरोप पीडिताने केला आहे.
पीडिताच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी आपला हेतू उघड करण्यापूर्वी सुरुवातीला त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्याने आरोप केला की, त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव आणला गेला, ज्यामध्ये त्याला कलमा पठण करण्यास आणि रुद्राक्ष माळ काढण्यास भाग पाडण्याचा समावेश होता. जेव्हा त्याने विरोध केला, तेव्हा कामाच्या ठिकाणी त्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करून चिथावणी देण्यात आली. अनेक वर्षे छळ सहन केल्यानंतर, पीडित व्यक्तीने आता संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली आहे.







