30 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरधर्म संस्कृतीबनावट इतिहासातून शनिवारवाड्यावर अतिक्रमण

बनावट इतिहासातून शनिवारवाड्यावर अतिक्रमण

हिंदूंच्या अस्मितेवर केलेले एक वैचारिक आक्रमण

Google News Follow

Related

शनिवारवाडा हे मराठा साम्राज्याच्या शौर्याचे, हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराचे आणि पेशव्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. अटक ते कटक, पेशावर ते तंजावुर आणि काठियावाड ते कोलकाता अशा संपूर्ण भारतभर झेंडे फडकवणाऱ्या मराठा शक्तीचे हे केंद्र राष्ट्रप्रेमाचे प्रेरणास्थान आहे. मात्र, एका संशयास्पद चबुतऱ्याच्या रूपात या राष्ट्रीय अस्मितेच्या प्रतीकावर झालेले अतिक्रमण हा हिंदूंच्या सांस्कृतिक वारशावर केलेला एक निर्लज्ज आघात आहे. अलीकडेच शनिवारवाड्यात नमाज पठण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, या वास्तूच्या भिंतीलगतच्या ‘मकबूल हुसैन मदनी दर्गा’ असे नाव दिलेल्या वादग्रस्त चबुतऱ्याकडे लक्ष वेधले गेले आहे. हा चबुतरा मजार नसून अतिक्रमण आहे असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. या तथाकथित मजारीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याने बनावट इतिहास रचून हिंदूंच्या पवित्र भूमीवर हक्क सांगण्याचा हा एक सुनियोजित कट आहे असे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. ‘मकबूल हुसैन मदनी’ नावाच्या व्यक्तीचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. असे असतानाही, पेशव्यांच्या सत्तेच्या केंद्रस्थानी हा दर्गा उभा राहतो, हे तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली होणाऱ्या हिंदूविरोधी धोरणांचेच फलित आहे. प्रतापगडावरील अफझल खानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवल्यानंतर, आता शनिवारवाड्याच्या प्रांगणातील हे अतिक्रमण हटवून इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याची गरज आहे.
‘मकबूल हुसैन मदनी’ नावाचा ऐतिहासिक बनावशनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाजवळ असलेल्या या मजारीच्या फलकावर ‘मकबूल हुसैन मदनी’ असे नाव आणि १८२९ हे स्थापना वर्ष लिहिलेले आहे. काही ठिकाणी तर १२४४ सालचाही उल्लेख आढळतो. हा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे की, पेशवेकालीन किंवा ब्रिटिशकालीन अशा कोणत्याही अधिकृत दस्तऐवजात या नावाच्या व्यक्तीची साधी नोंदही आढळत नाही. पेशवे दफ्तर, तत्कालीन प्रशासकीय नोंदी, पुणे गॅझेटियर किंवा मराठ्यांच्या बखरी यांसारख्या कोणत्याही विश्वसनीय स्रोतामध्ये ‘मकबूल हुसैन मदनी’ नावाचा कोणी पीर, फकीर किंवा महत्त्वाचा इसम पुण्याशी संबंधित असल्याचे पुरावे नाहीत.

पेशवाईनंतर अवघ्या ११ वर्षांत, म्हणजेच १८२९ मध्ये, मराठी सत्तेचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात एका मुस्लिम व्यक्तीचा दर्गा इतक्या सहजपणे उभारला गेला असणे अविश्वासार्ह आहे. ब्रिटिश प्रशासन जमीन आणि महत्त्वाच्या वास्तूंच्या नोंदी ठेवण्यात अत्यंत काटेकोर होते. अशा परिस्थितीत, अशा कोणत्याही बांधकामाची नोंद त्यांच्या कागदपत्रांमध्ये नाही. यातून हेच सिद्ध होते की, हे बांधकाम आणि त्यावरील नाव नंतरच्या काळात घुसडण्यात आले आहे. याच्याशी नामसाधर्म्य असलेल्या काही व्यक्ती इतिहासात आढळतात, जसे की १९६५ च्या युद्धातील पाकिस्तानी सैनिक मकबूल हुसैन किंवा देवबंदचे विद्वान हुसैन अहमद मदनी. परंतु त्यांचा या चबुतऱ्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. यावरून हे स्पष्ट होते की, ‘मकबूल हुसैन मदनी’ हे एक काल्पनिक पात्र असून, इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला धार्मिक संरक्षण मिळवून देण्यासाठी रचलेले हे एक षडयंत्र आहे. या बनावट ओळखीच्या आधारे हिंदूंच्या ऐतिहासिक जागेवर हक्क सांगण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

हे ही वाचा:

आधार कार्डसंदर्भातील नियम आजपासून बदलले

राष्ट्र उभारणीत गुंतलेल्या आरएसएसवर बंदी घालून काय साध्य होईल?

एशिया कप ट्रॉफीवर वाद! बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार

भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाचा संन्यास!

शांत अतिक्रमण

हिंदू संघटनांचा दावा आहे की या स्थळाचे सध्याचे स्वरूप, विशेषतः त्यावर लावलेल्या आधुनिक टाईल्स आणि चबुतऱ्याभोवती केलेले बांधकाम, हे ३०-४० वर्षांपेक्षा जुने नाही. हे बांधकाम गुपचूप अतिक्रमण करण्याच्या जिहादी धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. या धोरणानुसार, सुरुवातीला एखाद्या मोक्याच्या किंवा हिंदूंच्या पवित्र स्थळाजवळ एक छोटीशी कबर किंवा तत्सम रचना उभी केली जाते. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष होते. हळूहळू तिचे रूपांतर एका पक्क्या मजारीत केले जाते. त्यावर चादर चढवून त्याला एक बनावट ऐतिहासिक ओळख दिली जाते. काही वर्षांनंतर, ही जागा ‘शतकानुशतके जुनी’ असल्याचा दावा करून त्यावर कायदेशीर हक्क सांगितला जातो.

शनिवारवाड्याच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. काही अभ्यासक या जागेचा संबंध १४व्या शतकातील ‘धाकटा शेख सल्ला’ मजारीशी जोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा युक्तिवाद फसवा आहे. धाकटा शेख सल्ला दर्गा विश्वस्तांनी स्वतःच त्यांच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यास सहमती दर्शवली आहे, हे या संदर्भात महत्त्वाचे आहे. एका बनावट नावाने आणि खोट्या इतिहासाच्या आधारे, मराठ्यांच्या शौर्याच्या प्रतीकासमोर एक अतिक्रमण उभे केले गेले आहे, जे तात्काळ हटवणे आवश्यक आहे.

कायद्याचे उल्लंघन आणि प्रशासकीय निष्क्रियता

शनिवारवाडा हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा अंतर्गत संरक्षित ‘राष्ट्रीय स्मारक’ आहे. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष (AMASR) कायदा, १९५८’ नुसार, अशा स्मारकाच्या सीमेपासून १०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वादग्रस्त चबुतरा या प्रतिबंधित क्षेत्रातच येतो. त्यामुळे, त्याचे अस्तित्व हे सरळसरळ कायद्याचे उल्लंघन आहे.

याशिवाय, ASI च्या धोरणानुसार, ज्या संरक्षित स्थळांवर ASI ने ताबा घेतला तेव्हापासून धार्मिक उपासना अविरतपणे सुरू होती, केवळ तिथेच ती सुरू ठेवली जाऊ शकते. अशा स्थळांना ‘सजीव’ (living) स्मारके म्हणतात. ज्या स्थळांवर उपासना प्रचलित नव्हती, तिथे कोणतेही नवीन धार्मिक विधी सुरू करता येत नाहीत; अशा स्थळांना ‘निर्जीव’ (non-living) स्मारके म्हणतात.

शनिवारवाडा हे एक ‘निर्जीव’ स्मारक आहे. त्यामुळे, त्याच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी, जसे की चादर चढवणे किंवा नमाज पठण करणे, हे बेकायदेशीर आहे. वाड्याच्या आत झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर ASI ने तक्रार दाखल केली हे उल्लेखनीय आहे. परंतु ASI कडे अतिक्रमण हटवण्यासाठी थेट पोलीस कारवाईचे अधिकार नाहीत आणि त्यांना स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहावे लागते. या प्रशासकीय हतबलतेमुळे हिंदूंच्या वारसा स्थळांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

हिंदूंच्या अस्मितेच्या प्रतीकांच्या संरक्षणाबाबतच्या या निष्क्रियतेमागे एका विशिष्ट समाजाच्या भावनांची भीती आणि हिंदूंच्या भावनांची अवहेलनाच आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असायला हवी आणि शनिवारवाड्याच्या प्रांगणातील हे अतिक्रमण तात्काळ हटवून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे.

सांस्कृतिक आक्रमणाचा इतिहास

या अतिक्रमणाच्या उदात्तीकरणात हिंदूंच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांवर अतिक्रमण करून त्यांचे इस्लामीकरण करण्याच्या छद्म धर्मनिरपेक्ष (स्युडो सेक्युलर) विचारसरणीचा मोठा सहभाग आहे. भारतभर अनेक ठिकाणी मंदिरे पाडून त्या जागी मशिदी किंवा दर्गे उभारण्यात आले. पुण्यातील ‘पुणेश्वर’ आणि ‘नारायणेश्वर’ मंदिरांच्या जागी ‘शेख सल्ला’ दर्गे उभारले गेल्याचा उल्लेख ‘पुणे पेठ कैफियत’मध्ये आढळतो. हाच प्रकार देशभरात काशी, मथुरा आणि अयोध्या येथेही घडला. शनिवारवाड्याच्या बाहेरील हे अतिक्रमण त्याच मानसिकतेचे आधुनिक रूप आहे.

हिंदवी स्वराज्याचे केंद्र असलेल्या शनिवारवाड्यासमोर एक दर्गा उभा करणे, हे केवळ जागेचे अतिक्रमण नसून मराठ्यांच्या शौर्यावर आणि हिंदूंच्या अस्मितेवर केलेले एक वैचारिक आक्रमण आहे. हिंदूंच्या सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या स्थळांवरही आम्ही आमचे अस्तित्व प्रस्थापित करू शकतो असे दाखवून देण्यासाठी केलेले हे शक्ती प्रदर्शन आहे. अलीकडेच वाड्याच्या आत नमाज पठण करण्याच्या प्रकारामागे देखील हीच कुरापतखोरी होती. अशा घटनांच्या मागील मोठ्या आणि धोकादायक कारस्थानाला वेळीच रोखले पाहिजे. या अतिक्रमणाला मुळापासून उखडून टाकणे आपल्या संस्कृती आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्मितेचा संरक्षणासाठी आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा