26 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरक्राईमनामापश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण

पश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण

अल- कायदा, आयसिसशी संबंधित दहशतवादी गटांकडून सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत असल्याची माहिती

Google News Follow

Related

पश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये अल- कायदा आणि आयसिसशी संबंधित दहशतवादी गटांकडून सातत्याने हिंसाचार घडत आहे. अशातच वाढत्या हिंसाचाराशी झुंज देत असताना, मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही सशस्त्र लोकांनी गुरुवारी पश्चिम मालीच्या कोबरीजवळ भारतीयांचे अपहरण केले. ते स्थानिक विद्युतीकरण प्रकल्पांमध्ये काम करत असलेल्या एका कंपनीत काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, इतर सर्व भारतीय कामगारांना राजधानी बामाको येथे हलवण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही गटाने अपहरणांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. “आम्ही पाच भारतीय नागरिकांच्या अपहरणाची पुष्टी करतो. कंपनीत काम करणाऱ्या इतर भारतीयांना राजधानी बामाको येथे हलवण्यात आले आहे,” असे प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे.

लष्कराच्या अधिपत्याखाली असलेल्या मालीमध्ये वर्षानुवर्षे अस्थिरता आणि वाढत्या अतिरेकी हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. अल- कायदाशी संबंधित ग्रुप फॉर द सपोर्ट ऑफ इस्लाम अँड मुस्लिम्स (जेएनआयएम) ने अलीकडेच इंधनावरील नाकेबंदी कडक केली. ज्यामुळे आधीच गंभीर आर्थिक संकटात असलेला माली आता आणखी बिकट परिस्थितीचा सामना करत आहे.

२०१२ पासून वारंवार झालेल्या उठाव आणि जिहादी हल्ल्यांमुळे मालीमध्ये राज्य नियंत्रण कमी झाले आहे, त्यामुळे परदेशी नागरिकांचे अपहरण होणे सामान्य बाब झाली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, जेएनआयएमच्या दहशतवाद्यांनी बामाकोजवळ दोन अमिराती नागरिक आणि एका इराणी नागरिकाचे अपहरण केले होते. गेल्या आठवड्यात सुमारे ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची खंडणी दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प जी-२० परिषदेत सहभागी होणार नाहीत! कारण आले समोर

तेजस विमानांसाठी ११३ इंजिन खरेदीचा भारत- अमेरिकेमध्ये करार

घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

उज्जैनमधील मशीद पाडण्याविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली; प्रकरण काय?

२०१२ मध्ये तुआरेग बंडातून जन्मलेल्या जेएनआयएमने उत्तर मालीपासून देशाच्या मध्यभागी आणि सीमा ओलांडून बुर्किना फासो आणि नायजरपर्यंत आपला विस्तार सातत्याने वाढवला आहे. मालीचे लष्करी नेते, असिमी गोइता, बंडखोरी चिरडून टाकण्याचे वचन देऊन सत्तेवर आले, परंतु फ्रान्स आणि अमेरिकेशी संरक्षण संबंध तोडण्याचा आणि रशियाकडे वळण्याचा त्यांचा निर्णय फारसा यशस्वी झाला नाही. बामाको सरकारच्या नियंत्रणाखाली असताना, जेएनआयएम राजधानीकडे जाण्याची शक्यता अनेक मालीवासीयांना चिंतेत टाकते. ज्या भागात त्यांचे वर्चस्व आहे, त्या भागात या गटाने कठोर नियम लागू केले आहेत, हालचालींवर निर्बंध घातले आहेत आणि सार्वजनिक वाहतुकीत महिलांना हिजाब घालण्याचे आदेश दिले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा