27.2 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरदेश दुनियारांचीमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक! विधानसभेला घेराव

रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक! विधानसभेला घेराव

भाजपच्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन

Google News Follow

Related

झारखंडमधील रांची येथे, पीएससी (PSC) आणि एसएससी (SSC) परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. हे विद्यार्थी बॅरिकेड्स हटवत पुढे सरकत आहेत. दरम्यान, भाजपच्या आमदारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले, मात्र, नंतर पोलिसांनी त्यांना तिथून हटवले.

विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत आणि दोन किलोमीटरच्या परिघात ‘वॉटर कॅनन’ (पाण्याचे फवारे मारणारी यंत्रणा) तैनात करण्यात आली आहेत. तसेच, इतर जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.

विधानसभा घेराव घालण्यासाठी काढलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्हाला येथे अडवण्यात आले आहे, तरीही आम्ही शांततापूर्ण मार्गाने विधानसभेकडे कूच करू. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. JSSC-CGL परीक्षा रद्द करावी आणि तिची CBI चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.”

हे ही वाचा:

जो खेलेगा, वो खिलेगा…पंतप्रधानांचा राष्ट्रकुल विजेत्यांशी संवाद

अजित पवारांच्या घटनेनंतर बारामतीत पुन्हा विमान अपघात

झारखंडमध्ये संघर्ष तीव्र; सीबीआय चौकशी हवीच!

महाकाल दर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू

काल रात्री उशिरा जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर ५,००० हून अधिक विद्यार्थी जमले होते. सकाळ होताच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. शहरात विविध ठिकाणी काटेरी तारांचे कुंपण घालण्यात आले असून, बीएनएस (BNS) च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सहा-स्तरीय सुरक्षा कडे (सिक्स-लेअर सिक्युरिटी कॉर्डन) तैनात करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.

आंदोलन करत असताना विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांच्यासह अनेक पक्षनेत्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी झारखंडचे विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी म्हणाले, “विद्यार्थी आपले आंदोलन सुरूच ठेवत आहेत, परंतु सरकार जनतेचे लक्ष विचलित करत आहे. या सर्व जेपीएससी-जेएसएससी-सीजीएल प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी.” यापूर्वी, माजी मुख्यमंत्री मरांडी आणि भाजप नेते आदित्य साहू यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा