28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियादेशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

Google News Follow

Related

देशातील काही राज्यांमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रिफ्रेशमेंट ब्रेक, पीटी वर्ग आणि दोन शिफ्टमध्ये वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा शाळेत किलबिलाटाला सुरुवात होणार आहे.

५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनापूर्वी भारतातील सर्व शालेय शिक्षकांना प्राधान्याने लसीकरण करण्यास सांगितले आहे. कोविड सुरक्षा प्रोटोकॉलसह शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक दिनापूर्वी भारतभरातील सर्व शालेय शिक्षकांना प्राधान्याने लसीकरण करण्यास सांगितले आहे. उद्यापासून देशाची राजधानी दिल्ली शाळांसाठी खुली झालेली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळा सुरू करण्याविषयी राष्ट्रीय स्तरावर अनेक तज्ज्ञांनी होकार भरलेला आहे.

१ सप्टेंबर पासून प्रत्येक वर्गात फक्त ५०% विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच अनिवार्य थर्मल स्क्रीनिंग, दुपारचे जेवण ब्रेक, पर्यायी बसण्याची व्यवस्था आणि नियमित अतिथी भेट टाळणे ही दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) सप्टेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी घोषित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहेत.

तामिळनाडूच्या शाळा १ ते सप्टेंबरपासून ठरवल्याप्रमाणे ९ वी ते १२ वी, महाविद्यालये आणि पॉलिटेक्निकचे क्लासेस तामिळनाडूमध्ये पुन्हा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी सोमवारी घोषणा केली. नियमांच्या नवीन संचाने महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांना (वर्ग ९ ते १२) तामिळ एन मध्ये १ सप्टेंबर पासून परिवहन महामंडळाच्या बसमध्ये त्यांच्या संस्थांना मोफत (बस पास शिवाय) प्रवास करू शकतात.

हे ही वाचा:

धक्कादायक! घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर महिन्याभरात ४० अपघात

जीएसटी संकलनाची कोटी कोटीची झेप!

‘दलाल’ व्हायरसचा बळी

ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही

हरियाणा मधील शाळांनी १ सप्टेंबरपासून ४ आणि ५ च्या वर्गांसाठी प्राथमिक शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पूर्व लेखी परवानगीने शाळेत येण्याची परवानगी दिली जाईल. ५०% क्षमतेसह शाळा पुन्हा उघडल्या जाणार आहेत. १ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय नंतर घेतला जाईल, असे राज्याचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले. राजस्थान सरकारनेही ९ सप्टेंबरपासून १२ वी साठी शाळा पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. कोविड -१९ प्रोटोकॉल राखण्यासाठी प्रत्येक सत्रात केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची परवानगी दिली जाईल. तेलंगणामधील शाळा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा