31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावले

Google News Follow

Related

केंद्रात भाजपा विरुद्ध भक्कम पर्याय उभा राहावा यासाठी सारे विरोधक एकटवले आहेत. सुमारे १५ विविध पक्षांची शुक्रवार, २३ जून रोजी पाटण्यात बैठक पार पडली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही आणि झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच त्यांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल,” अशी घाणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!

“बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा