पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावर भाजपाचे आमदार अतूल भातखळकर यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीनंतर अतूल भातखालकरांना धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे.” असे अतुल भातखळकर यांनी सांगितले.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
भाजपाचे आमदार अतूल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार या मंत्र्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडेंना अशाच प्रकारे महिलेशी संबंध ठेवल्याप्रकरणी ठाकरे सरकारने पाठीशी घातले होते याची आठवणही त्यांनी करून दिली.
पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर संशयाची सुई आहे. दरम्यान संजय राठोड हे सध्या “नॉट रिचेबल” असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
या प्रकारानंतर अतूल भातखळकर यांना अनेक गुंडांचे धमकीचे फोन यायला सुरवात झाली आहे. या अशा धमक्यांना बधणारा मी नाही. असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनाही अशाच प्रकारे धमक्यांचे फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राठोड यांचे ‘आयुष्य उद्ध्वस्त’ होणार या भीतीने खुद्द मुख्यमंत्री चिंताक्रांत आहेत
मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या त्या ऑडीयो क्लीप ऐकल्या असत्या तर कोण आयुष्यातून उठले आहे आणि कोणामुळे हे त्यांच्या लक्षात आले असते @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021