जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट केली असून यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदींचे एक पोस्टर शेअर केले असून त्यात त्यांचे डोके, हात आणि पाय गायब असल्याचे दाखवले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले आहे की जबाबदारीच्या वेळी ‘गायब’. यावरून भाजपाने आता कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “काँग्रेस ‘सर तन से जुदा’ या प्रतिमेचा वापर करत आहे यात काही शंका नाही. हे केवळ राजकीय विधान नाही; तर ते त्यांच्या मुस्लिम मतपेढीला उद्देशून केलेले भाषण आहे आणि पंतप्रधानांविरुद्ध एक छुपा इशारा आहे. काँग्रेसने अशा युक्त्यांचा अवलंब करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधानांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन दिले आहे आणि त्याचे समर्थनही केले आहे. तरीही काँग्रेस कधीही यशस्वी होणार नाही, कारण पंतप्रधानांना लाखो भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. जर कोणाची मान कापली गेली असेल तर ती काँग्रेस आहे.
The Congress leaves little doubt with its use of “Sar Tan Se Juda” imagery. This is not merely a political statement; it is a dog whistle aimed at its Muslim vote bank and a veiled incitement against the Prime Minister. It is not the first time the Congress has resorted to such… https://t.co/WEgblPq2FX
— Amit Malviya (@amitmalviya) April 29, 2025
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, या पोस्टवरून हे सिद्ध झाले आहे की काँग्रेस आता पाकिस्तान परस्त पार्टी (पाकिस्तान समर्थक पार्टी) बनली आहे. दोघांचीही स्क्रिप्ट सारखीच आहे, तर त्यांची काम आणि संस्कृतीही सारखीच झाली आहे. भाजपा खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, “काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानची भाषा बोलण्याची काय सक्ती आहे? पाकिस्तानला का पाठिंबा दिला जात आहे? भारतीयांचे रक्तपात पाहून त्यांना राग येत नाही का? त्यांचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सैफुद्दीन सोझ आपल्याला सांगतात की जेव्हा पाकिस्तान म्हणतो की त्यांचा या हल्ल्यात सहभाग नाही, तेव्हा आपण त्यांचे ऐकले पाहिजे आणि पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा थांबवू नये. काँग्रेस कोणाच्या बाजूने उभी आहे? भारत की पाकिस्तान? भारताने सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हाही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. आता थोडाच वेळ झाला आहे आणि काँग्रेसने भारतावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे आणि पाकिस्तानची बाजू घेऊ लागली आहे. पाकिस्तान समर्थक काँग्रेसचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. काँग्रेस नेते वादग्रस्त विधाने करत आहेत आणि पक्ष नेतृत्व त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही.”
हे ही वाचा..
‘ज्ञान पोस्ट’च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार शिक्षण
जम्मू-काश्मीर : बारामुल्लामधील भीषण आगीत दोन घरे खाक
पिवळ्या टॉपमध्ये मोनालिसाने केले फोटोशूट, काय म्हणाले चाहते ?
देवदार: आयुर्वेदिक गुणधर्मांचा खजिना
या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी या घटनेची माहिती सभागृहाला द्यावी. कोणताही राजकीय अजेंडा नाही. काँग्रेसकडे फक्त एकच सूत्र आहे – एकता, असे ते म्हणाले.