31 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरराजकारणअमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

Google News Follow

Related

आगामी काळात अमेठी आणि रायबरेलीला जाण्यापूर्वी प्रियंका आणि राहुल गांधी अयोध्येला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानात राहुल गांधी रिंगणात असतील. वायनाडमधून काँग्रेसचे विद्यमान खासदार असलेले गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या ॲनी राजा यांच्याविरुद्ध लढतील. वायनाड मतदारसंघातील लढत संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठीच्या निवडणुकीकडे लागले आहे.

अमेठी आणि रायबरेली या महत्त्वाच्या मतदारसंघांसाठी २६ एप्रिल रोजी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी अमेठी व रायबरेलीला जाण्यापूर्वी अयोध्येला भेट देतील आणि राम मंदिरात प्रार्थना करतील. उत्तर प्रदेशातील दोन जागांसाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत काँग्रेस नेत्यांनी अद्याप तोंड उघडलेले नाही.

अमेठी आणि रायबरेलीला जाण्यापूर्वी राम लल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रियंका आणि राहुल गांधी यांची अयोध्येला संभाव्य भेट होऊ शकेल, असे सूत्रांनी सूचित केले आहे. तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
दोघांनीही येथून लढण्याचे ठरवल्यास १ ते ३ मे दरम्यान उमेदवारी अर्ज भरला जाऊ शकतो. ३ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

राहुल गांधींनी सन २००४मध्ये अमेठीमधून राजकीय पदार्पण केले होते आणि २०१९मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत होण्यापूर्वी तीनदा या जागेवरून विजय मिळवला होता. तथापि, गांधींना वायनाडमधून लोकसभेची जागा मिळवण्यात यश आले.

हे ही वाचा:

जनता दलाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या!

भारतात तीन दशकांहून अधिक काळ वारसा कर होता, इंदिरा गांधींची संपत्ती त्यांच्या नातवंडांना हस्तांतरित करण्याच्या एक महिना आधी राजीव गांधी सरकारने तो रद्द केला!

‘डीआरडीओ’ने बनविले भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांचा जेवणाचा प्रश्न मिटला, अवघ्या २० रुपयांत मिळणार जेवण!

रायबरेली हा २००४पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सोनिया गांधी यांनी २००४पासून रायबरेलीची जागा सांभाळली. तथापि, फेब्रुवारीमध्ये सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून आल्या आणि २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत रायबरेलीमधून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. उल्लेखनीय म्हणजे, रायबरेली ही उत्तर प्रदेशातील एकमेव जागा होती जिथे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गांधी दावेदार मिळतील का, अशी अटकळ सातत्याने बांधली जात आहे.
या दोन्ही मतदारसंघांत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा