35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणपंजाबमधील काँग्रेस सरकारने केला पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा?

पंजाबमधील काँग्रेस सरकारने केला पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब येथे दौऱ्यासाठी गेले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा दौराच रद्द झाला आहे. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्यामुळे हा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गांभीर्याने याची दखल घेतली असून या घटनेचा अहवाल पंजाब सरकारकडून मागवला असून याची जबाबदारी कोण घेणार हे पंजाब सरकारने ठरवावे आणि दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

मोदी आज पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. त्यानुसार आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. मात्र, पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामान सुधारले नाही, तेव्हा रस्त्याने जायचे असे ठरवण्यात आले. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.

हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा तेथे काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकला होता. एका बाजूने पंतप्रधान यांचा ताफा जात असताना उड्डाणपुलावर आंदोलक वावरताना दिसत असल्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी आवश्यक आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळाकडे वळवण्यात आला आणि त्यांची सभा पुढे ढकलण्यात आली.

या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून याविषयीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांबद्दल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. शेतकरी कायदे रद्द केल्यावर पंतप्रधानांचा हा पहिला पंजाब दौरा असणार होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा