बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदानापूर्वी प्रचार मोहिमेने शिगोशी गाठली आहे. प्रचारात आश्वासने, धोरणे आणि आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी बिहारमध्ये एनडीए प्रचंड बहुमताने सरकार बनवेल, असा ठाम दावा केला आहे. भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी मंगळवारी सांगितले, “१२१ जागांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपेल. आम्ही स्पष्ट बहुमताच्या आमच्या उद्दिष्टाच्या सुमारे ७० टक्के टप्प्यावर पोहोचलो आहोत. बिहारमध्ये एनडीएविषयी लोकांमध्ये उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, राष्ट्रीय अध्यक्षांचे कार्यक्रम आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभांमध्ये मोठी लाट दिसत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “येथील लोकांमध्ये अफाट उत्साह दिसतोय. या उत्साहावरूनच स्पष्ट होते की बिहारची जनता तेजस्वी यादव यांना सत्तेत आणणार नाही. लोकांना अजूनही लालू प्रसाद यादवांच्या काळातील ‘जंगलराज’ आठवतो आणि त्या दिवसांची आठवण लोकांना घाबरवते.” शाहदेव पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सातत्याने प्रगती करत आहे. जनकल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आम्ही पहिल्याच टप्प्यात दोन तृतीयांश जागा जिंकणार आहोत. महागठबंधनलाही आता समजले आहे की त्यांच्या हातून सत्ता जाणार आहे.”
हेही वाचा..
म. फुले जनआरोग्य योजना ते चंद्रपुरात अभियांत्रिकी तंत्रनिकेतन! मंत्रिमंडळ बैठकीतले २१ निर्णय
‘लिव्ह इन’ जोडप्याची आत्महत्या; चौथ्या मजल्यावरून उडी मारली
मुंबई विमानतळावर अमली पदार्थ, परकीय चलन जप्त
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत २५ नोव्हेंबरला येणार
झारखंडमध्ये झामुमो आघाडीच्या कामगिरीवरील काँग्रेस अध्यक्ष प्रदीप बलमुचू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, शाहदेव म्हणाले, “प्रदीप बलमुचू हे वरिष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि अनेक वेळा आमदार राहिले आहेत. जेव्हा ते झामुमोबरोबरच्या करारावर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा स्पष्ट होते की झारखंडमधील महागठबंधनातील पक्षांमध्ये एकात्मता आणि समन्वयाचा अभाव आहे.” शाहदेव म्हणाले की, “बिहारमधील या आघाडीतील पक्षांची विचारसरणी एकमेकांशी जुळत नाही. हे लोक फक्त सत्तेच्या लालसेने एकत्र आले आहेत, पण जनतेच्या कल्याणाचा विचार करत नाहीत. लोकांना फसवून सत्ता फार काळ टिकत नाही, हे त्यांना आता उमगेल.”







