बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी सत्तेच्या दाव्यांची मालिका सुरू केली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही पॅनलमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप नेते सुशील सिंह यांनी दावा केला आहे की एनडीए यावेळी बिहारमध्ये २०० जागा जिंकून मजबूत सरकार स्थापन करेल.
सुशील सिंह म्हणाले, “बिहारच्या जनतेचा विश्वास एनडीएवर आहे. आम्ही मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकू आणि २०० जागांसह एक स्थिर आणि मजबूत सरकार बनवू.” केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या जागावाटपावरील नाराजीबाबत विचारले असता सुशील सिंह म्हणाले, “कोणतीही नाराजी नाही. ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी इच्छा असते. यात काहीच अयोग्य नाही. राजकीय पक्ष अधिक जागा मागतात, जेणेकरून त्यांच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता येईल. यात काहीच गैर नाही.”
हेही वाचा..
श्रीलंकन नौदलाने तमिळनाडूच्या ३० मच्छीमारांना घेतले ताब्यात
“कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात केले होते का?” बालकांच्या मृत्यूनंतर WHO चा सवाल
पंतप्रधान मोदी यांनी इस्रायल-हमास शांतता करारावर व्यक्त केला आनंद
एनआयएच्या छापेमारीत सापडले घबाड
ते पुढे म्हणाले की, “एक-दोन दिवसांत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. नामांकनापूर्वी सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जातील.” राजद नेते तेजस्वी यादव यांच्या वक्तव्यांवर टोला लगावत सुशील सिंह म्हणाले, “ते जे काही बोलतात, त्याचा काही अर्थ नसतो. जनता त्यांना गंभीरतेने घेत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज पार्टी’च्या पहिल्या यादीबाबत विचारले असता त्यांनी म्हटले, “त्यांची यादी जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल की ते तेजस्वी यादव आणि महागठबंधनाला मदत करणार आहेत की नाही. बिहारची जनता जागरूक आहे आणि सर्व काही समजून घेत आहे.”
सुशील सिंह यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “बिहारमध्ये एनडीएच्या तोडीस तो महागठबंधन नाही. बिहारच्या जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विकास कार्यावर आहे. १४ नोव्हेंबरला एनडीए सरकार बनवेल आणि बिहारच्या विकासासाठी सातत्याने काम करत राहील. आम्हाला याबाबत कोणताही संभ्रम नाही.”







