25 C
Mumbai
Monday, November 10, 2025
घरक्राईमनामाश्रीलंकन नौदलाने तमिळनाडूच्या ३० मच्छीमारांना घेतले ताब्यात

श्रीलंकन नौदलाने तमिळनाडूच्या ३० मच्छीमारांना घेतले ताब्यात

Google News Follow

Related

श्रीलंकन नौदलाने तमिळनाडूच्या ३० मच्छीमारांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चार ट्रॉलर बोटी जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा ओलांडून मासेमारी केल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली, जेव्हा मच्छीमार भारत आणि श्रीलंका यांना विभाजित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषेजवळ पाक सामुद्रधुनीत मासेमारी करत होते.

तमिळनाडू मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या सकाळी रामेश्वरम जेट्टीवरून ३३९ बोटींना मासेमारीसाठी परवानगीचे टोकन जारी करण्यात आले होते. रामेश्वरम, थंगाचिमादम आणि आसपासच्या किनारी भागातील मच्छीमार नेहमीप्रमाणे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. काही बोटी सुरक्षित परत आल्या, मात्र एक गट नियमित गस्त घालणाऱ्या श्रीलंकन नौदलाच्या जवानांच्या हाती सापडला.

हेही वाचा..

“कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात केले होते का?” बालकांच्या मृत्यूनंतर WHO चा सवाल

पंतप्रधान मोदी यांनी इस्रायल-हमास शांतता करारावर व्यक्त केला आनंद

एनआयएच्या छापेमारीत सापडले घबाड

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सदस्यत्व रद्द

नौदल दलाने ३० मच्छीमारांना ताब्यात घेतले, त्यांच्या पकडलेल्या माशांसह चार ट्रॉलर जप्त केले आणि त्यांना चौकशीसाठी उत्तरी श्रीलंकेत असलेल्या नौदल तळावर नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती उशिरा रात्री मिळाली आणि अधिकृत माध्यमांतून भारतीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. या घटनेनंतर रामेश्वरमच्या मच्छीमार समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मच्छीमार नेते जेसु राजा यांनी या कारवाईचा निषेध केला आणि केंद्र सरकारला तातडीने राजनैतिक स्तरावर हस्तक्षेप करून मच्छीमारांची सुटका करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “हे फक्त सीमा उल्लंघनाचे प्रकरण नाही; हे मासेमारीवर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. सरकारं मूकदर्शक राहू शकत नाहीत – या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येचं कायमस्वरूपी समाधान हवं.”

दुसरे मच्छीमार नेते सागायम यांनी चिंता व्यक्त केली की या अटकांमुळे किनारी भागात सणांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे, कारण दिवाळी जवळ आली आहे. ते म्हणाले, “अनेक महिला आणि मुले यामुळे खूप चिंतेत आहेत, कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पकडण्यात आले आहे. आम्ही राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी तत्काळ कारवाई करून मच्छीमारांना त्यांच्या बोटीसह परत आणावे.” पाक सामुद्रधुनीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. मासेमारीच्या हक्कांवरील वाद सोडवण्यासाठी अनेक वर्षांपासून राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत, तरीही श्रीलंकन अधिकारी वेळोवेळी तमिळनाडूच्या मच्छीमारांना अटक करतात, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा