35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारण‘वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी शरम असल्यास आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’

‘वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी शरम असल्यास आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’

Google News Follow

Related

वरळी येथील बीडीडी चाळीत ३० नोव्हेंबरला सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते. त्यांना मुंबईमधील नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, केवळ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जखमींपैकी चार महिन्यांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर मुलाच्या वडिलांना आणि काल मुलाच्या आईला आपला प्राण गमवावा लागला आहे. यावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला धारेवर धरले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित

लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान

वरळी सिलेंडर स्फोटातील चार जखमींपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले लहान बाळ, नंतर त्याचे वडील आणि नंतर त्याची आई. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, असे नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे. यासाठी निर्लज्ज मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचे आभार, असा खोचक टोला नितेश राणे यांनी सरकारला आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे. या घटनेची शरम असल्यास आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असेही नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये ३० नोव्हेंबरला सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाळाच्या वडिलांचा आणि आईचाही मृत्यू झाला. भाजप आमदार आशिष शेलार यांनीही याप्रकरणी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. पेंग्विनसाठी दिवसाला दीड लाख खर्च करतात पण बाळासाठी वेळ नाही असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा