27 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरराजकारण“बाबरच्या नावाने भारतात कोणतीही मशीद बांधली जाणार नाही”

“बाबरच्या नावाने भारतात कोणतीही मशीद बांधली जाणार नाही”

भाजपचे दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर केली टीका

Google News Follow

Related

भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांच्या बाबरी मशीद संदर्भातील वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, लोकांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर प्रार्थनास्थळे बांधण्याची मुभा असली तरी, भारतात कधीही मुघल शासक बाबरच्या नावाने कोणतीही रचना बांधली जाणार नाही.

हुमायून कबीर यांच्या विधानाला उत्तर देताना दिलीप घोष म्हणाले की, “कोणीही स्वतःच्या जमिनीवर मंदिर किंवा मशीद बांधू शकतो, परंतु बाबरच्या नावाने भारतात कोणतीही मशीद बांधली जाणार नाही. हिंदू समुदायाने ४५० वर्षे त्याच्याविरुद्ध लढा दिला, त्याच्या इमारती उध्वस्त केल्या आणि नंतर राम मंदिर बांधले. बाबर आक्रमक होता; त्याच्या नावाने येथे काहीही बनवले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे “बाबरी मशिदीची” पायाभरणी करण्याच्या आपल्या योजनेचा पुनरुच्चार कबीर यांनी केल्यानंतर, पश्चिम बंगालमध्ये वाढलेल्या राजकीय देवाणघेवाणीच्या दरम्यान घोष यांचे हे विधान आले आहे. कबीर यांनी आपला पवित्रा कायम ठेवत म्हटले की, “आम्ही ६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे बाबरी मशिदीची पायाभरणी करू.” या प्रकल्पाला तीन वर्षे लागतील आणि विविध मुस्लिम नेते सहभागी होतील अशी घोषणा करून त्यांनी यापूर्वी वाद निर्माण केला होता.

हे ही वाचा:

“वंदे मातरम्”वरील चर्चेसाठी संसदेत विशेष चर्चासत्र; पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार?

डिजिटल अरेस्टच्या सर्व प्रकरणांची चौकशी करा, बँकांची भूमिका देखील तपासा!

हिवाळी अधिवेशन: पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडली ‘ही’ दोन विधेयके

‘उमीद’वर वक्फ मालमत्तेची माहिती अपलोड न केल्यास भरावा लागणार दंड!

पश्चिम बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनीही वादग्रस्त विधान करत तणाव वाढवला होता. बाबरी मशीद पाडणे आणि त्यानंतरच्या घडामोडींना अन्याय्य ठरवत ते म्हणाले, “मशीद जबरदस्तीने पाडण्यात आली आणि मंदिर बांधण्यात आले. आम्ही याच्याशी सहमत नाही.”

चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिलीप घोष यांनी असे म्हटले की, येत्या निवडणुकीपूर्वी मंत्र्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. देशातील सामान्य लोकांनी, सर्व पक्षांनी ते स्वीकारले आहे आणि मंदिर बांधले गेले आहे. निवडणुका येत आहेत, त्यांना तिकीट हवे आहे आणि ते पुन्हा मंत्री होऊ इच्छितात. म्हणूनच ते अशी वादग्रस्त विधाने करत आहेत,” अशी खोचक टीका घोष यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा