33 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरराजकारणपंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गेंना नोटीस

पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गेंना नोटीस

निवडणूक आयोगाने २४ तासांत मागितले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘दहशतवादी’ संबोधले होते. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची भारतीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी बुधवार, २२ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच खर्गे यांना त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत २४ तासांच्या आत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ म्हटल्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, त्यांना नोटीस बजावली आहे आणि २४ तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.”

बुधवार, २२ तारखेला निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह भाजप नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. या शिष्टमंडळाने भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार खर्गे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी औपचारिक तक्रार सादर केली.

बैठकीनंतर बोलताना रिजिजू म्हणाले, “आम्ही व्यथित आणि संतप्त आहोत. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो आणि काँग्रेस अध्यक्षांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक आयोग आपला निर्णय घेईल, तर आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक दहशतवाद्याला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतो.” आपल्या तक्रारीत, भाजपने खर्गे यांचे वक्तव्य “धक्कादायक आणि लज्जास्पद” असल्याचे म्हटले आहे आणि पुढे म्हटले आहे की, “हे केवळ अपमानकारक नाही; तर लोकशाही संस्थांवरील हा एक धोकादायक आणि अभूतपूर्व हल्ला आहे. आदर्श आचारसंहितेचे हे उघड उल्लंघन आहे. तात्काळ कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

पक्षाने तात्काळ सार्वजनिक माफीची मागणी केली असून निवडणूक आयोगाला बीएनएसच्या कलम १७५ आणि ३५६(१) अंतर्गत कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आयोगाला “आक्षेपार्ह विधानाचा पुढील प्रसार तात्काळ थांबवण्याचे” निर्देश देण्यास आणि ते प्रसारमाध्यमे व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जाईल याची खात्री करण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

मुर्शिदाबादमध्ये तृणमूल आणि हुमायून कबीर यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भिडले

जम्मू-काश्मीरची महिला क्रिकेटपटूसह दोन साथीदार सेक्सटॉर्शन-खंडणीप्रकरणी अटकेत

दोन दिवसांत २ बलात्कार, १ हत्या; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येतील आरोपी अटकेत

इस्रायली हल्ल्यात लेबनॉनमधील महिला पत्रकार ठार

प्रकरण काय?

तामिळनाडूतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, मंगळवार, २१ एप्रिल रोजी, खर्गे यांनी भाजपसोबत युती केल्याबद्दल एआयएडीएमकेवर टीका केली, तेव्हा हा वाद सुरू झाला. आपल्या भाषणात ते म्हणाले, “ते (एआयएडीएमके) मोदींसोबत कसे काय सामील होऊ शकतात ? तो एक दहशतवादी आहे. आणि जो समानतेवर विश्वास ठेवणार नाही. त्याचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवणार नाही. आणि हे लोक त्यांच्यासोबत सामील होत आहेत, याचा अर्थ ते लोकशाहीला कमकुवत करत आहेत.” त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वादळ निर्माण झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा