23 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरराजकारण"राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता"

“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद यांचा खळबळजनक खुलासा

Google News Follow

Related

रामजन्मभूमी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच, राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर राम मंदिरासंबंधीचे निर्देश रद्द करेल, असे सांगितल्याचा दावा माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोमवार, ६ मे रोजी केला.

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी या संदर्भातील एक निवेदन जाहीर केले आहे. “मी काँग्रेसमध्ये ३२ वर्षांहून अधिक काळ आहे. मात्र जेव्हा राम मंदिराचा निर्णय आला तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले की, काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते एक शक्तिशाली आयोग स्थापन करतील, म्हणजे ज्या प्रमाणे राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय बदलला होता, तसा राममंदिराचा निर्णय ते रद्द करतील,” असे आचार्य प्रमोद यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद यांनी या वर्षी २२ जानेवारीला श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने काँग्रेस पक्षावर टीका केली होती. फेब्रुवारीमध्ये, काँग्रेसने त्यांचे बेशिस्त वर्तन आणि पक्षाविरोधात वारंवार विधाने केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी केली.

अलीकडच्या काळात काँग्रेसच्या अनेक माजी नेत्यांनी राममंदिरासंदर्भातील पक्ष नेतृत्वासमोरील अडचणी उघड केल्या आहेत. सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे राधिका खेरा यांनी ५ मे रोजी दिलेला पक्षाचा राजीनामा. अयोध्येतील राम मंदिराला भेट दिल्यानंतर पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीला दिलेल्या पत्रात केला आहे.

‘प्राचीन काळापासून धर्माचे समर्थन करणाऱ्यांना विरोध केला जात आहे, हे एक प्रस्थापित सत्य आहे. हिरण्यकशिपूपासून रावण आणि कंसापर्यंत याची उदाहरणे आहेत. प्रभू श्री रामाचे नाव घेणाऱ्यांना सध्या काही लोक विरोध करत आहेत. प्रत्येक हिंदूसाठी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी हे पवित्र स्थान आहे. प्रत्येक हिंदू केवळ रामलल्लाचे दर्शन घेणे, म्हणजे आपले जीवन सार्थ झाले, असे मानत असताना काही लोक त्याला विरोध करत आहेत,’ असे त्यांनी म्हटले होते.

४ एप्रिल रोजी गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, ते मला अजिबात पटत नाही. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा देशाच्या संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नाही. मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.’

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!

पूंछ हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी, २० लाखांचे बक्षीस जाहीर!

दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना बॉम्बची धमकी!

‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राम मंदिर कार्यक्रम वगळण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला ‘पाप’ म्हटले होते. राममंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारल्याच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, ‘ राममंदिराचे आमंत्रण मिळाले होते आणि काँग्रेसने ते आमंत्रण नाकारले, मी ते स्वीकारू शकत नाही. आघाडीच्या नेत्यांनी सनातनवर प्रश्न उपस्थित केला, त्याला काँग्रेस प्रतिसाद का देत नाही?… मी आज भाजपमध्ये सामील झालो आहे आणि मला आशा आहे की माझी क्षमता आणि ज्ञान भारताला पुढे नेण्यासाठी वापरेल…” नंतर, त्यांनी एकनिष्ठ हिंदू असल्याचा दावा करूनही प्राणप्रतिष्ठेच्या तीन महिन्यांनंतरही राम मंदिराला भेट न दिल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा