29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरराजकारणसगळं खुल केलं मग मंदिर का बंद?

सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?

Google News Follow

Related

ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद? असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी चार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

शासनाने विविध ठिकाणी निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार सगळं काही आता नियम अटींनुसार सुरु झालंय. मग आता मंदिरंही बंद नकोत. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली.

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, असं तुषार भोसले म्हणाले आहेत. सगळं खुल केलं मग मंदिरही बंद नकोत, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा

‘या’ देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला

बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

कोरोना काळात नियम आणि अटींच्या अधिपत्याखाली राहून सगळं काही सुरु असतं. मग मंदिरं उघडी ठेवायलाच काय अडचण होते. हे सरकार हिंदूविरोधी आहे. यांना हिंदूंचं काहीही देणंघेणं नाहीय, अशी टीका करत मंदिरं उघडण्यासाठी तुषार भोसले सातत्याने आग्रही असतात. अनेक वेळा मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा