27.8 C
Mumbai
Saturday, July 25, 2026
घरस्पोर्ट्सवैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने भारताची विजयी सलामी

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने भारताची विजयी सलामी

झिम्बाब्वेवर ७ विकेट्सनी दणदणीत मात

Google News Follow

Related

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला दमदार विजयाने सुरुवात केली. हरारे येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा १२६ धावांचा माफक लक्ष्य केवळ तीन गडी गमावून आणि तब्बल ४० चेंडू राखून पार केले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी. त्याने १९ चेंडूत अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. त्याच्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, ज्यामुळे झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना कोणतेही उत्तर सापडले नाही.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या. वेस्ली मधेवेरेने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले, मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. त्याला इशान किशनने ३५ धावांची साथ दिली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद २८ धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
हे ही वाचा:
फिटनेसपलीकडे वेलनेसचा नवा ट्रेंड

नाशिकमध्ये गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर

महिला आंदोलकाला थप्पड मारणे भोवले

कॉन्स्टेबलची हत्या…अनंतनागमध्ये लष्करच्या दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीचे विशेष कौतुक केले. इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या या खेळीतून दमदार पुनरागमन करत आपल्या प्रतिभेची पुन्हा एकदा प्रचिती दिली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
322,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा