28 C
Mumbai
Wednesday, April 15, 2026
घरविशेष‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’

‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’

अमित शहा यांचा दावा

Google News Follow

Related

‘देशाच्या विविध भागांतील लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण पूर्ण झाल्यानंतर भाजपने आधीच ३१० जागांचा टप्पा ओलांडला असून उर्वरित दोन टप्प्यांत भाजप ४०० जागा घेऊन पक्ष आपले लक्ष्य पार करेल,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला.ओदिशाच्या संबलपूर लोकसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ‘एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या ओदिशात ७५पेक्षा जास्त विधानसभा जागा मिळवून सरकार स्थापन करण्याचेही आपले लक्ष्य आहे,’ असे ते म्हणाले.

‘सध्याची निवडणूक देशाला मजबूत बनवण्यासाठी, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि ओदिशाला विकसित बनवण्यासाठी आणि ओडियाचा अभिमान पुन्हा मिळवण्यासाठी आहे,’ असे ते म्हणाले.मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि त्यांचे तामिळनाडूत जन्मलेले त्यांचे जवळचे सहकारी व्हीके पांडियन यांच्यावर निशाणा साधत शहा यांनी आरोप केला की मुख्यमंत्री राज्यात ‘बाबूशाही’ (बाबू संस्कृती) लादत आहेत आणि त्यांनी ओडिया संस्कृतीचा अनादर केला आहे. ‘विपुल नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध राज्य असूनही, ओदिशा गरीब आहे.

नवीन पटनायक यांचे बाबू संसाधने लुटण्याचे काम करत आहेत. उत्कलच्या भूमीवर तामिळ बाबूने राज्य करावे का? ओडियात बोलू शकणारी आणि भगवान जगन्नाथाच्या परंपरा पुढे नेणाऱ्या व्यक्तीवरच हे काम सोपवले जाऊ शकते. २५ वर्षांनंतर ओडिशात ओडिया भाषा, संस्कृती आणि साहित्याच्या आधारे सरकार स्थापन होणार आहे,’ असे शाह म्हणाले.
‘आम्हाला असा ओडिशा बनवायचा आहे जिथे एकाही तरुणाला त्याची पत्नी आणि वृद्ध आई-वडिलांना सोडून महाराष्ट्र, हरियाणा किंवा बंगलोरला मजुरीसाठी जावे लागणार नाही. त्याला त्याच्या मूळ राज्यात काम मिळू शकेल.

हे ही वाचा:

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

ओडिशामध्ये सुंदर ठिकाणे, लांबलचक समुद्रकिनारा, खाण संसाधनांचा मोठा साठा आणि कष्टाळू तरुण आहेत, परंतु राज्याला केवळ कठोर परिश्रम करू शकणारा मुख्यमंत्री नाही. राज्यात भाजपला सत्तेवर निवडून द्या, आम्ही ओडिशाला एका कष्टाळू आणि उत्साही तरुण मुख्यमंत्री देऊन हे राज्य विकसित करू,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘बीजेडीने पश्चिम ओडिशाकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु ओडिशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. राज्यातील २७ लाख कुटुंबांकडे घरे नाहीत, २६ लाख कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे, शाळा बंद आहेत आणि व्यवसाय सुलभ करण्यात राज्य २९व्या क्रमांकावर आहे. नवीन पटनायक सरकार केवळ केंद्रीय योजनांचे अपहरण करत आहे आणि केवळ रिकामी पोती देत आहेत, तर मोदीजी मोफत तांदूळ देत आहेत,’ असा आरोप शहा यांनी केला.

पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराचा मुद्दा उपस्थित करून शहा म्हणाले की, रत्न भांडारचे दरवाजे कितीवेळा उघडले गेले आणि चाव्या हरवल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचा अहवाल सहा होऊनही सार्वजनिक का केला जात नाही, याबाबत कोणीच बोलत नाही. “ओदिशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर, आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे मूल्यांकन केल्यानंतर रत्न भंडारच्या यादीचे सर्व तपशील प्रदान करू. आयोगाचा अहवालही सार्वजनिक केला जाईल,’ असे शाह म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा