सीमावर्ती राज्यांमधील लोकसंख्येतील बदल, विशेषत: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हे सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचे मुख्य कारण आहे. बीएसएफ डीजी पंकज सिंह यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सिंह म्हणाले की, “सीमावर्ती राज्यांमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र ५० किमीपर्यंत वाढवण्याचे एक कारण म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल हे आहे. यातील लोकसंख्या कशी बदलली याची जिल्हानिहाय रचना आमच्याकडे आहे.”
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ही माहिती २०११ च्या जनगणनेवर आधारित आहे, जे सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लक्षणीय लोकसंख्येतील बदल दर्शविते. बीएसएफच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, नवीनतम संख्या जास्त लोकसंख्याशास्त्रीय बदल दर्शवू शकते, परंतु सीमा ओलांडून घुसलेल्या घटकांचा सामना करण्यासाठी बीएसएफला सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मंगळवारी, केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले की बीएसएफच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राचा विस्तार १५ किमीवरून ५० किमीपर्यंत केल्याने राज्य पोलिसांच्या सहकार्याने सीमापार गुन्ह्यांवर चांगले आणि अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.
पश्चिम बंगाल आणि पंजाबने अशी भीती व्यक्त केली आहे की असे पाऊल राज्य सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करते. त्यांची भीती निराधार आहे, असे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार सजदा अहमद यांना लेखी उत्तर देताना सांगितले. सरकार हा निर्णय मागे घेण्याचा विचार करत आहे का, अशी विचारणा त्यांनी केली होती.
हे ही वाचा:
सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू
‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’
११ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, केंद्राने बीएसएफ अंतर्गत पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आसाम या सीमावर्ती राज्यांमध्ये अटक करण्यासाठी आणि शोध आणि जप्तीची कारवाई करण्यासाठी ५० किमीचे कार्यक्षेत्र प्रमाणित केले.