32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषकाँग्रेस प्रवेश केला, राजदूतपद काढले; गिर्यारोहकाने केली म. प्र. सरकारवर टीका !

काँग्रेस प्रवेश केला, राजदूतपद काढले; गिर्यारोहकाने केली म. प्र. सरकारवर टीका !

मेघा परमार आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपांना राज्य सरकारचे अद्याप उत्तर नाही

Google News Follow

Related

माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करणाऱ्या मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला गिर्यारोहक मेघा परमार यांची ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाच्या राज्य राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. मेघा यांनी २२ मे २०१९ रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते. तिथे पोहोचणाऱ्या त्या मध्य प्रदेशातील पहिल्या महिला ठरल्या होत्या.मेघा यांनी ९ मे रोजी छिंदवाडा येथील एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रम आणि राज्य डेअरी ब्रँड ‘सांची’च्या राजदूतपदावरून हटवण्यात आले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १० मे रोजी त्यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमाच्या राजदूत म्हणून हटवल्यानंतर, पाच दिवसांनंतर, १५ मे रोजी, त्यांचे नाव राज्य डेअरी ब्रँड सांचीच्या राजदूत म्हणूनही वगळण्यात आले. या घडामोडीनंतर, काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.‘ती आमच्या पक्षात आल्यामुळेच तिला राजदूत पदावरून दूर केले गेले. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मेघा यांना केवळ त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, या एकमेव गुन्ह्यासाठी अशी वागणूक दिली गेली,’ असा आरोप काँग्रेसचे नेते के. के. मिश्रा यांनी केला.

हे ही वाचा:

वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे

इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !

पाच कोटी रुपये भरा अन्यथा अटक : सेबीचा चोक्सीला इशारा !

ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली

यावर मेघा परमार यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘भाजपसाठी मी बेटी बचाओ नव्हे तर बेटी हटाओ’ झाली आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. जगातील सर्वोच्च शिखर जिंकण्याची मी कल्पनाही केली नव्हती. कमलनाथ यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला आर्थिक मदत केली. परिणामी, मी जगातील सर्वोच्च शिखर जिंकू शकले. चित्रपट अभिनेत्रींऐवजी कमलनाथ यांनी शेतकऱ्याच्या मुलीला ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ मोहिमेची राजदूत बनवले. परंतु महिलांच्या सन्मानाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारने त्याच शेतकऱ्याच्या मुलीला राजदूत पदावरून काढून टाकले,’ असे मेघा परमार म्हणाल्या.

‘महिला सक्षमीकरणाबाबत भाजपकडून केले जाणारे दावे आज उघड झाले आहेत. शिवराज सरकारच्या या कृतीने माझा केवळ अपमानच झाला नाही तर महिला सक्षमीकरणाची अवहेलना झाली आहे,’असेही त्या म्हणाल्या. मेघा परमार आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपांना राज्य सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा