जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याद्वारे राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी निवेदन जारी केले आहे. त्यांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ला पाठिंबा देत भारत सरकार व सैन्य दलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
आरएसएसने म्हटले की, राष्ट्रीय संकटाच्या या क्षणी संपूर्ण देश तन-मन-धनाने देशाच्या सरकार व सैन्य दलांसोबत खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ‘ऑपरेशन सिंदूर’ ची छायाचित्रे शेअर करत लिहिले, “पहलगाम येथील भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तानप्रेरित दहशतवाद्यांवर व त्यांच्या समर्थक तंत्रावर केलेल्या निर्णायक कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी भारत सरकारच्या नेतृत्वाचे व सैन्य दलांचे मनःपूर्वक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या निर्घृण हत्याकांडाने व्यथित कुटुंबांना व संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी सुरू असलेल्या या कारवाईने देशाच्या स्वाभिमान व धैर्यात भर घातली आहे.”
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “आमचे असेही मत आहे की पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर, त्यांच्या रचनेवर व सहाय्यक तंत्रावर होत असलेली सैनिकी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक व अपरिहार्य आहे. राष्ट्रीय संकटाच्या या क्षणी संपूर्ण देश तन-मन-धनाने देशाच्या सरकार व सैन्य दलांसोबत खंबीरपणे उभा आहे. पाकिस्तानी सैन्याद्वारे भारताच्या सीमांवर धार्मिक स्थळांवर व नागरी वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची आम्ही तीव्र निंदा करतो आणि या हल्ल्यांचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतो.”
हे ही वाचा:
कुतुबमिनार, लाल किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवली!
पीएसएल एक्स चे सामने युएईत हलवले
जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सात दहशतवादी कंठस्नान
राजस्थानमधून जेएफ-१७ चा एक पाकिस्तानी पायलट ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू!
आरएसएसने पुढे लिहिले, “या आव्हानात्मक प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशवासियांना आवाहन करतो की शासन व प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना पूर्णपणे पाळाव्यात. याचबरोबर प्रत्येकाने आपले नागरिक कर्तव्य पार पाडताना सतर्क राहून राष्ट्रविरोधी शक्तींच्या सामाजिक ऐक्य व समरसता भंग करण्याच्या कोणत्याही कटयंत्रास यशस्वी होऊ देऊ नये. सर्व देशवासियांना विनंती आहे की आपली देशभक्ती दाखवत, सैन्य व नागरी प्रशासनाला आवश्यक तेथे व आवश्यक तेवढा सहकार्य द्यावा आणि राष्ट्रीय ऐक्य व सुरक्षा टिकवण्याच्या सर्व प्रयत्नांना बळ द्यावे.”