भारत-पाकिस्तानदरम्यान वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एचबीएल पाकिस्तान सुपर लीग एक्सचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत (UAE) हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी पीसीबीने अधिकृत निवेदनात सांगितलं की, आता उर्वरित ८ सामने युएईमध्ये खेळवले जातील. यापूर्वी हे सामने रावळपिंडी, मुलतान आणि लाहोरमध्ये होणार होते.
याबाबत तारीख आणि नवीन स्थळांची माहिती लवकरच दिली जाईल, असंही बोर्डाने स्पष्ट केलं.
हेही वाचा :
अफवांपासून सावध राहा, जबाबदार नागरिक बना!”
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित
पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ
हिटमॅनचा टेस्ट क्रिकेट प्रवास: रोहित शर्माची संस्मरणीय कारकीर्द
पीसीबीचे अध्यक्ष मोहित नकवी यांनी म्हटलं की, “खेळ आणि राजकारण वेगळं असावं”, ही भूमिका बोर्डाची नेहमीच राहिली आहे. पण रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हल्ला होण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागला.
नकवी यांनी आरोप केला की, भारताने जाणूनबुजून क्रिकेट स्टेडियमला लक्ष्य केलं, जेणेकरून एचबीएल पीएसएल एक्समध्ये अडथळा निर्माण करता येईल. घराबाहेरील तसेच परदेशी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय आवश्यक ठरला, असं त्यांनी सांगितलं.