केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी सांगितले की, भारताची पवन ऊर्जा क्षमता मागील वर्षीच्या ४६.४२ गीगावॅटच्या तुलनेत १०.५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन आता ५१.५ गीगावॅट झाली आहे. ‘ग्लोबल विंड डे’ च्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, “५१.५ गीगावॅट क्षमतेसह आपण नवकल्पना, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत प्रगतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत आहोत.”
जोशी यांनी म्हटले, “या ग्लोबल विंड डेच्या दिवशी, भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रगतीला गती देणाऱ्या पवन उर्जेच्या शक्तीचा सन्मान करूया. त्यांनी नमूद केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “सौर ऊर्जा असो वा पवन ऊर्जा, भारत उज्वल आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी वेगाने पुढे जात आहे.”
हेही वाचा..
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सर्व ७ जणांचा मृत्यू
हेलिकॉप्टर अपघात : एसओपी लागू करण्याचे आदेश
रूपाणी यांचा डीएनए अद्याप जुळला नाही !
ब्रिटनमध्ये सात पाकिस्तानी दोषी; दोन मुलींचे लैंगिक शोषण
सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता गेल्या वर्षीच्या १९३.५८ गीगावॅटच्या तुलनेत २२६.७४ गीगावॅटवर पोहोचली, ज्यामुळे १७.१३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या एकूण क्षमतेपैकी, सौर ऊर्जा क्षमताही मे २०२४ मध्ये ८४.२८ गीगावॅटवरून ३१.४९ टक्क्यांनी वाढून ११०.८३ गीगावॅट झाली आहे.
भारताने २०१४ मध्ये केवळ २.८२ गीगावॅट असलेल्या सौर ऊर्जा क्षमतेपासून आजपर्यंतच्या कालखंडात मोठी झेप घेतली आहे. सौर ऊर्जा निर्मितीच्या वाढीला सौर सेल्स आणि वेफर्सच्या मजबूत देशांतर्गत उत्पादन क्षमतेने पाठबळ दिलं आहे, जी २०१४ मध्ये जवळजवळ अस्तित्वात नव्हती. आता भारताने २५ गीगावॅटच्या सौर सेल्स आणि २ गीगावॅट वेफर उत्पादन क्षमतेसह भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत भारताची अक्षय ऊर्जा क्षमता ५०० गीगावॅटपर्यंत नेण्याचं ध्येय जाहीर केलं आहे, जे जलवायू परिवर्तनाविरुद्धच्या लढ्यातील एक मोठं पाऊल ठरणार आहे.







