भारताचे लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी पाकिस्तानस्थित दहशतवादाविरुद्धची लष्करी कारवाई, ऑपरेशन सिंदूरमधून शिकलेल्या धड्यांची आठवण करून दिली. तसेच सशस्त्र दलांच्या कृती आणि क्षमतांनी शत्रू शेजाऱ्याला वास्तवाची पडताळणी कशी करून दिली हे देखील अधोरेखित केले.
“ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता जो ८८ तासांत संपला. आम्ही भविष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. जर पाकिस्तानने संधी दिली तर आम्ही त्यांना शेजारी राष्ट्राशी जबाबदारीने कसे वागायचे ते शिकवू,” असा कडक इशारा जनरल द्विवेदी यांनी सोमवारी नवी दिल्लीत ‘चाणक्य संरक्षण संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिला.
या कारवाईतून शिकलेल्या धड्यांबद्दल, जनरल द्विवेदी यांनी तीन मुख्य मुद्दे अधोरेखित केले. सैन्यांमधील एकात्मता, लांबलेल्या लढाईसाठी योग्य पुरवठा सुनिश्चित करणे आणि कमांड साखळीच्या प्रत्येक स्तरावर निर्णय घेतले जातील याची खात्री करणे. ते म्हणाले की, “जेव्हा जेव्हा काही ऑपरेशन होते तेव्हा आपण त्यातून शिकतो, यावेळीही आपण गोष्टी शिकलो. एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणताही निर्णय घेण्यासाठी आणि प्रत्येक स्तरावर वेळेवर निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ असतो.” त्यांनी सैन्यांमधील एकत्रीकरणावर भर देत म्हटले की, आजच्या लढाया या बहु- क्षेत्रीय आहेत. केवळ सैन्य नाही तर हवाई दल आणि नौदलालाही एकत्र लढावे लागेल असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा..
बलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही
माई-बहिण सन्मान योजना आधी घरातून सुरु करा
बंगालमधील एसआयआरमुळे घुसखोर बांगलादेशात पळू लागलेत!
डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की “आजही आपण लढाई किती काळ चालेल हे सांगू शकत नाही. यावेळी आपण ८८ तास लढलो; पुढच्या वेळी ते चार महिने किंवा चार वर्षेही असू शकते. ते पाहता, आपल्याकडे ते लढण्यासाठी पुरेसा पुरवठा आणि शस्त्रे आहेत का? जर आपल्याकडे नसतील तर आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागेल,” असे ते पुढे म्हणाले.”







