29.3 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरविशेषऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र...

ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र सचिव

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशनन सिंदूर’मधून घेतला आहे. भारतीय लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे. भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’वर पत्रकार परिषद घेतली. या माध्यमातून देशातील जनतेला पाकिस्तानविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.

पत्रकार परिषदेपूर्वी पाकिस्तानने भारतावर केलेल्या सर्व मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे दृश्य दाखवण्यात आले. यानंतर, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, भारताच्या कारवाईकडे दहशतवाद रोखण्याच्या संदर्भात पाहिले पाहिजे. दहशतवादाविरुद्ध केलेली कारवाई आहे. पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानकडून कोणतेही स्पष्ट पाऊल उचलले गेले नाही. भारताने जबाबदारीने कारवाई केली. दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली ही प्रतिक्रिया होती. भारताने यामध्ये आपला अधिकार बजावला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे आणि त्याचा उद्देश देशात जातीय तणाव वाढवणे होता. पण देशातील जनता आणि सरकारने ते यशस्वी होऊ दिले नाही.

विक्रम मिसरी यांनी म्हटले की, पहलगाम हल्ला हा मुंबई हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता ज्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. भारताने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केलेली नाही; पाकिस्तानी सैन्य आणि नागरी ठिकाणांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य केलेले नाही. पण जर पाकिस्तानने भविष्यात काहीही करण्याचे धाडस केले तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

विक्रम मिसरी पुढे म्हणाले की, “२२ एप्रिल २०२५ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी आणि पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. त्यांनी लोकांच्या कुटुंबासमोर त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. कुटुंबातील सदस्यांना जाणूनबुजून मानसिक धक्का दिला आणि त्यांना परत जाऊन संदेश देण्याचा सल्ला देण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुनर्संचयित होत असलेल्या सामान्य परिस्थितीला अडथळा आणण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता,” असे मिस्री म्हणाले.

“पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे, त्याची रूपरेषा पाकिस्तानच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळते. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे, दहशतवादी येथे लपण्यासाठी येतात. हल्ल्याला १५ दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही. आज भारताने सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे. दहशतवादाविरुद्ध मोजमापाने कारवाई केली असून आमची कृती चिथावणीखोर नाही. आम्हाला गुप्तचर माहिती होती की आणखी हल्ले होऊ शकतात. २५ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानने केलेला दबाव देखील लक्षात घेतला पाहिजे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीतून दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत,” असे विक्रम मिसरी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, दहशतवादी साजिद मीरचं प्रकरण लक्षात घेता या दहशतवाद्याला अतिरेक्याला पाकिस्तानने मृत घोषित केलं होतं. पण आंतरराष्ट्रीय दबावानंतर तो जिवंत असल्याचं आढळून आलं. यावरून पाकिस्तान काय करतो हे स्पष्ट आहे.

हे ही वाचा:

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”

“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य

ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद

यानंतर विशेष म्हणजे लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाकडून स्क्वॉड्रन लीडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. या कारवाईत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्या म्हणाल्या की, गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. भारताने केलेली कारवाई ही पहाटे १.०५ ते १.३० च्या दरम्यान झाल्याचे त्यांनी सांगितले. कारवाई करण्यासाठीची लक्ष्ये विश्वसनीय आणि गुप्तचर माहितीच्या आधारे निवडण्यात आली. यामध्ये सामान्य लोकांना त्रास होणार नाही याची खात्री करण्यात आली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा