पहलगाम हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पहिल्याच प्रतिक्रियेत कठोर टीका केली. एक्सवर त्यांनी ट्वीटकरत ‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर’ असे म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन ‘सिंदूर’ हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे गृहमंत्र्यांनी म्हटले.
यापूर्वी एका भाषणात गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या बदला घेतला जाईल असे म्हणत दहशतवाद्यांना इशारा दिला होता. “जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला हा त्यांचा विजय आहे, तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की हा नरेंद्र मोदींचा भारत आहे आणि एक एक करून बदला घेतला जाईल,” असे ते म्हणाले होते.
हे ही वाचा :
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?
“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य
“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाककडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; तीन नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी मध्यरात्रीनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यामध्ये भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. हे ठिकाण लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे काय नुकसान झाले हे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेले असण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक टॉप कमांडर दहशतवादी असल्याची माहिती आहे.