32 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरविशेषनिर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात

निर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच खळबळजनक विधान

Google News Follow

Related

इंडी आघाडीमधील सहभागी घटक पक्षांमधील वाकयुद्ध संपायचे नाव घेत नाही. देशात महत्वाच्या गोष्टी घडत असतात तेव्हा राहुल गांधी बेपत्ता होतात, असे मत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केले आहे. महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान राहुल गांधी कधीही देशात नसतात, असेही ते म्हणाले आहेत.
मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना पिनाराई विजयन म्हणाले, महत्त्वाच्या गोष्टी घडतात तेव्हा राहुल गांधी कुठे असतात? जेव्हा आपल्या देशात अत्यंत निर्णायक प्रसंग येतो तेव्हा राहुल गांधी येथे कधीच नसतात. निर्णायक काळात राहुल गांधी भारतात कसे नसतात यावर आम्ही चर्चा केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी सांगितले होते की राहुल गांधी आजारी आहेत आणि ते बुधवारपासून (२४ एप्रिल) पासून पुन्हा निवडणूक प्रचार सुरू करतील.

हेही वाचा..

सचिन तेंडुलकरचे १०० शतकांव्यतिरिक्त हे रेकॉर्ड मोडणे अशक्य

जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा

हार्दिक पंड्याच्या मदतीला सेहवाग आला धावून 

‘काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’

राहुल गांधींची डीएनए चाचणी झाली पाहिजे : पीव्ही अन्वर

मुख्यमंत्री विजयन यांच्या शिवाय डाव्या-समर्थित अपक्ष आमदार पीव्ही अन्वर यांनी राहुल गांधींवर टीका केली की काँग्रेस नेत्याला गांधी आडनाव वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांची डीएनए चाचणी झाली पाहिजे.
मुख्यमंत्री विजयन म्हणाले, राहुल गांधी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांना जशास तसे समर्पक उत्तर मिळेल. गेल्या आठवड्यात कोट्टायम येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ते प्रत्येक दिवशी माझ्यावर हल्ला करतात पण भाजपने मुख्यमंत्री विजयन यांच्यावर हल्ला का केला नाही? दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत पण पिनाराई विजयन नाहीत. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे मी केरळमध्ये आलो तेव्हा भाजपवर हल्ला केला, पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर हल्ला करण्यात २४ तास घालवले. तेच ते सतत करत असतात. काही कारणास्तव भाजप केरळच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करत नाही, असे ते म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री विजयन यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला.
विजयन यांनी गुरुवारी सांगितले की डाव्या पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशाभूल धोरणांना विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रमाणीकरणाची गरज नाही. सीपीआय आणि काँग्रेस हे विरोधी भारत इंडी आघाडीमध्ये असताना दोन्ही पक्ष केरळमध्ये प्रबळ दावेदार आहेत आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात आपले मजबूत उमेदवार उभे केले आहेत.
वायनाडमध्ये राहुल गांधींना उमेदवारी देण्याच्या इंडी आघाडीच्या भागीदार काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राशी सामना करण्याऐवजी राहुल गांधींच्या केरळला भेट देण्याच्या निर्णयावर प्रत्येकजण प्रश्न करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा