28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषराहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत

राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत

काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी जातीय विभाजन आणि धार्मिक द्वेषाचा वापर करत असल्याने अखेर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यावर आक्षेप घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राहुल गांधींनी दिलेल्या राष्ट्रीय जात जनगणनेवर आक्षेप घेतला आहे.आनंद शर्मा यांनी नमूद केले की राष्ट्रीय जात जनगणना हा निवडणूक वादात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून उदयास आला आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीने त्याला समर्थन दिले आहे. तथापि सामाजिक न्यायावरील काँग्रेसचे धोरण भारतीय समाजाच्या गुंतागुंतीच्या परिपक्व आणि माहितीपूर्ण आकलनावर आधारित आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आनंद शर्मा म्हणाले की,जात हे भारतीय समाजाचे वास्तव असले तरी काँग्रेसने कधीही अस्मितेचे राजकारण केले नाही किंवा त्याचे समर्थन केले नाही. प्रदेश, धर्म, जात आणि वंशाची समृद्ध विविधता असलेल्या समाजातील लोकशाहीसाठी हे हानिकारक आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचा सर्वसमावेशक दृष्टिकोनावर विश्वास आहे, जो गरीब आणि वंचितांसाठी समानता आणि सामाजिक न्यायासाठी धोरणे तयार करण्यात भेदभावरहित आहे. जात जनगणनेचा मुद्दा हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या वारशाचा अनादर आहे. जातीच्या विभाजनावर पक्षाच्या ऐतिहासिक भूमिकेपासून दूर जाणे ही देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. त्यांनी आठवण करून दिली की इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांनीही जाती-आधारित विभाजनाला कसा विरोध केला होता, जात जनगणनेचा मुद्दा त्या भूमिकेच्या विरोधात आहे.

हेही वाचा..

डीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

१९८० मध्ये इंदिरा गांधींची घोषणा होती की, ना जात पर ना पात पर, मोहर लगेगी हाथ पर. १९९० च्या मंडल दंगलीनंतर राजीव गांधी यांनी ६ सप्टेंबर १९९० रोजी लोकसभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणात असे म्हटले होते की. जर आपल्या देशात जातीवाद रुजवण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल तर आम्हाला अडचण आहे. जातिवाद हा घटक बनवला जात असेल तर आम्हाला अडचण आहे. संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांसाठी. काँग्रेस पाठीशी उभी राहून देशाचे विभाजन होताना पाहू शकत नाही. शर्मा यांनी असा युक्तिवाद केला की जात जनगणनेची अंमलबजावणी “इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या वारशाचा अनादर करणे असा चुकीचा अर्थ लावला जाईल. १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने शेवटची देशव्यापी जात जनगणना केली होती आणि स्वातंत्र्यानंतर, अनुसूचित जाती आणि जमाती वगळता, जनगणनेमध्ये जातीशी संबंधित प्रश्न कॅनव्हास न करण्याचा जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा