पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसवर व्होट बँकचे राजकारण केल्याचा आरोप केला.पंतप्रधान मोदींनी दावा केला की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील गुंड गुन्हेगारांना वाचवण्यासाठी संदेशखाली येथील अत्याचारित महिलांना धमकावत आहेत.राहुल गांधींचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरातून आपल्या राजपुत्राच्या वयापेक्षाही कमी जागा मिळतील.दरम्यान, राहुल गांधी हे ५३ वर्षाचे आहेत.पश्चिम बंगाल मधील बैरकपूर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्वांनी पाहिले आहे की, टीएमसीने संदेशखाली येथील महिला आणि बहिणींसोबत काय केले आहे. टीएमसीचे गुंड आता संदेशखाली येथील महिलांना धमकी देत आहेत, कारण मुख्य आरोपीचे नाव शाहजहान शेख असे आहे.संदेशखाली येथील दोषींना कायदेशीर कारवाई पासून वाचवण्यासाठी टीएमसी कोणतीही कासर सोडत नाहीये.टीएमसीला घाबरण्याचे काम नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.नाव ना घेता राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत देशभरातून काँग्रेसला त्यांच्या राजपुत्राच्या वयापेक्षाही कमी जागा मिळतील.
हे ही वाचा:
स्मृती ईराणानी उडवली राहुल गांधींची खिल्ली
कर्नाटकात तिघा पुरुषांचे अपहरण करून छळ
‘प्रचार सभेत आईचा फोटो पाहून पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर उमटलं हसू, झाले भावुक’
संभाजीनगरात मोबाईलच्या दुकानात सापडले ३९ लाख, नोटा मोजण्याचे मशीन!
पंतप्रधान मोदींनी जनतेला ५ आश्वासने दिली.ते म्हणाले की, धर्माच्या आधारवर कोणीही आरक्षण देऊ शकत नाही.एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही.रामनवमी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.सीएए लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.ते पुढे म्हणाले की, टीएमसीला धडा शिकविला जाईल आणि बंगालच्या लोकांना लुटणाऱ्यांना सोडले जाणार नाही, ही मोदीची गँरंटी असल्याचे त्यांनी सांगितले.